Saturday, March 5, 2011

मला आवडलेलं....

निराशेच्या क्षणी तुमची लेखणी तुमच्या मदतीला येत नाही. दु:ख कमी झाल्यावरच शब्द आठवतात. कवितेची बीजं मात्र त्या क्षणीच रोवली जातात. माझ्या बहुतेक कविता रात्रीच्या अंधारातच जन्माला आल्या आहेत.


निराशेच्या झटक्यात मी माझ्या कविता फाडून टाकल्या. काही काळानंतर माणसाला आपलीच रचना केवढी परकी वाटायला लागते. आणि तरीही प्रत्येकाला त्या त्या वेळी आपण म्हणजेच मोठे प्रतिभावंत वाटत असतो.

तुमच्यातली कला तुम्हाला जोपासावी लागते. एखाद्या जवळच्या मित्राची छोटीशी प्रतिक्रियाही मोठी जखम करु शकते आणि कवितेचा जन्म होवू शकतो


आनंदात मुक रहावं
पण वेदनेत बोलकं व्हावं!
मग, प्रत्येक क्षणाचं वारं
कसं अखंड झोकत जावं!

No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.