Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Wednesday, February 21, 2024

पाश



मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा त्याच्या जोडीदारासह अनपेक्षित पाऊल उचलतो.‌ दोघांच्या वागण्याने घरादाराची फसवणूक होते, घरातल्यांना समाजाला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न पडतो. प्रेमाचे पाश या कुटुंबाला बांधून ठेवतात की ते पाश गळ्याभोवती आवळले जातात?

Monday, November 16, 2020

दिवाळीचा साहित्य फराळ



 नमस्कार मित्र मैत्रिणींनो ,

माझा दिवाळीचा फराळ हा असा आहे:
१ सामना दिवाळी अंकात ’चोरीचा मामला’ ही माझी हलकीफुलकी कथा आहे.
२ प्रसाद दिवाळी अंकात पाचशे मैल ही गोर्डन वेन (Gordon Wayne) या
युवकाच्या जीवनावर प्रेरणादायी कथा आहे.
३ अनुराधा दिवाळी अंकात काटशह ही कथा नावाप्रमाणेच एकमेकांवर कुरघोडी
करण्याच्या प्रयत्नात असणार्या काही प्राध्यापक आणि विद्यार्थीनीची आहे.
४ मेहता ग्रंथ जगतच्या दिवाळी अंकात मांजर, नवरा आणि मुलं हा ललित लेख
आहे. कोणाची, कुणाशी तुलना केलेली आहे हे लेख वाचलात तरच कळेल 🙂
५ माझा मराठीचा बोल (मामबो) या इ दिवाळी अंकात ती वही ही पती - पत्नी
आणि त्यांच्या मित्राच्या वहीची हलकीफुलकी कथा आहे.
६ बृहनमहाराष्ट्र वृत्तच्या दिवाळी अंकात दृष्टी ही कथा विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या
नात्याचे पदर उलगडणारी कथा आहे.
७ अभिरुची दिवाळी अंकात त्सुनामी या आमच्या मांजराच्या आगमनाची,
तिच्यावर ओढवलेल्या संकटाची कथा म्हणजेच माझा ललित लेख आहे.
यातले मामबो आणि बृहनमहाराष्ट्र वृत्त आंतरजालावर वाचण्यासाठी हा दुवा -
मामबो - https://www.mazamarathichabol.org/
(इथे गेल्या चारवर्षांचे दिवाळी अंक वाचता येतील)
बृहनमहाराष्ट्र वृत्त - https://bit.ly/3kvwbEN
वाचा आणि अभिप्रायही कळवा ही विनंती.

Tuesday, March 31, 2020

इटुकल्या पिटुकल्या गोष्टी

माझ्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी  सांगितलेल्या माझ्या गोष्टी -  FB - Live




आजोबा
 'चष्मा आण, पाणी दे. चहा कर.आजोबा दिसेल त्याला पकडतात. कामांची रेल्वेगाडी सोडतात. आई म्हणते, नाचवतात सगळ्यांना.
मी त्यांना  काम सांगितलं की मात्र ओरडतात,
 'हातपाय आहेत ना? स्वत:ची कामं स्वत: करायची' असं म्हणतात आणि आरामखुर्चीत डुलत बसतात.
मी आज खोलीत लपून बसलो. कामांची रेल्वेगाडी आजीने हाकली.  आजोबा गेले. मी हळूच विचारलं.
"गेले का जमदग्नी?"
"कोण जमदग्नी? बाहेर ये." आजोबा खेकसले. मी घाबरलो.  आजोबा होते की इथेच. मी पळणार होतो पण आजोबांनी मला धरून आणायला आजीला पाठवलं असतं.
"बाहेर ये." आजोबा परत जोरात ओरडले. मी बाहेर आलो.
"कोण जमदग्नी?" आजोबांनी डोळे वटारुन विचारलं.
"आजी तुम्हाला जमदग्नी  म्हणते.  जमदग्नी म्हणजे काय?" आजोबानी मला उत्तर दिलं नाही. ते  आजीवर वसकन ओरडले.  आजी आहे कुठे? आजी तिथे नव्हतीच.  नेहमी मी पळतो. आज आजी पळाली.
पण मला कुणीतरी सांगा ना,  जमदग्नी म्हणजे काय?
                                      -----------------------------------------
 भगदाड

"उठ गं" आईचा आवाज चढला.
"झोपले की उठवतेस. उठले की झोपवतेस." मी कुरकुरले.
"लाडात येऊ नकोस." ती चिडली. निघून गेली.  मी उगाच भिंतीवर पाय मारला. इकडच्या भिंती पोकळ. भगदाडच पडलं. मी घाबरले.
"काय झालं?" आईने खालून जोरात विचारलं
"पुस्तक पडलं."  मी भगदाड झाकलं. त्यावर उशी ठेवली. धावत खाली गेले.
"खरं सांगितलं की तू ओरडत नाहीस ना?"
"काय केलंस?" आई चिडली. मी गप्प.
"सांग. नाही ओरडणार." नाईलाजाने आई म्हणाली.
तिला मी खोलीत नेलं. भगदाड दाखवलं.
"?" आईचं तोंड उघडंच राहिलं. ती मटकन बसलीच.  चिडली, बडबडायला लागली.
"तू ओरडणार नव्हतीस." मी रडायला लागले.
"मी ओरडत नाहीये." ती ओरडत म्हणाली.
मोठी माणसं! बोलतात एक, वागतात वेगळं. मोठी माणसं! 
-----------------------------------------
मजा
 एकदा मजा झाली. आईने न सांगता मी सगळं केलं. दात घासले, आंघोळ केली. नाश्ता कटकट न करता खाल्ला, गृहपाठ केला. एकदम शहाण्यासारखी वागले. आईला धक्काच बसला. बाबाला वाटलं मला अक्कल आली.
दादा म्हणाला,
"काहीतरी गडबड आहे." तो  गडबड शोधायला खोलीत गेला.  माझ्या, त्याच्या. परत आला.
"काय रे? काय उद्योग केले आहेत कार्टीने?" आईने विचारलं.
"काही नाही." तो पुटपुटला. मी दादाची फजिती झाली म्हणून टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात बाबा दादाचं चित्र घेऊन आला. मी घाबरले. आईच्या मागे लपले.
"पिकरुने काढलंय?" आईने विचारलं.
"नाही. दादाचं नाव पुसलं..." बाबा म्हणाले.
"म्हणजे?" आईला काही कळलं नाही.
"चित्र कुणी काढलं?" बाबानी विचारलं.
"मी काढलं." दादा म्हणाला.
"नाव कुणाचं दिसतंय?" बाबानी विचारलं. दादाने नीट पाहिलं.
"माझं नाव पुसून हिने तिचं घातलं."  दादा किंचाळला.
"म्हणून शहाण्यासारखी वागत होती." आई पुटपुटली. दादाने मला ढकललं,  केस ओढले.  मी पुन्हा बेअक्कल झाले.  भोकाड पसरलं.

-----------------------------------------
थोबाडीत
 आमच्याकडे मायाताई काम करते. उशीरा येते. कधीकधी येतच नाही. आजही तिचा पत्ता नव्हता.
"एक लगावणार आहे तिच्या." आई म्हणाली. दार वाजलं.  मायाताई आली.
"आई, तुझ्या एक लगावणार आहे." मी तिला सांगितलं. मायाताई थांबलीच नाही. पळाली.
आईने माझ्या एक लगावली. मी कोपर्‍यात रडत बसलो.
"नको तेव्हा नको ते बोलतेस. तुझ्या बाबांसारखं."
"मग त्यांना लगाव." बाबा आला आणि कोपर्‍यात बसला.
"त्याला लगाव ना." मी पुन्हा म्हटलं. आई हसली आणि तीही कोपर्‍यात येऊन बसली.
या मोठ्या माणसांचं काही समजत नाही. आई - बाबांनी  मला जवळ घेतलं.
"मायाताईची भांडी बाबा घासणार आहे." आई म्हणाली
"म्हणजे?" मला काहीच कळत नव्हतं.
"अरे, तू बाबांना लगाव म्हणालास ना?"
"हो."
"मग बाबांनी भांडी घासली की झालं."
आई ना. नेहमी कोड्यात बोलते.
तुम्हाला कळलं का? कळवाल का याचा अर्थ?







Friday, January 31, 2020

संकोच

"तोच तोच विनोद तू मला का सांगतेस?" आईवर मी चिडले आणि दाणदाण पाय आपटीत
माझ्या खोलीत आले. खोलीचं दार धाडकन बंद केलं.
"दार मोडेल. हळू आपट." घ्या, माझ्या रागापेक्षा आईला दाराची काळजी. पुन्हा एकदा दार उघडून जोरात आपटावं असं वाटलं मला; पण तसं केलं तर संपलंच. आईची बडबड जी चालू होईल ना ती थांबणं कठिण. मी पलंगावर अंग टाकलं आणि माझा राग हळूहळू शांत होत गेला. हो, आता मी चौदा वर्षांची आहे तर आई गेल्यावर्षीपासून तिच्या कामाच्या ठिकाणी पोनीटेलने केलेला विनोद सांगते दरवेळेस. कधी मला, कधी सर्वांना. इतकी लाज आणते ना. सगळे हसतातही तिच्या या विनोदावर. मूर्ख नुसते. आजही तेच म्हणाली,
"पोनीटेल म्हणतो तसं तुला एका पिंपात घालायला पाहिजे आणि १९ वर्षांची झालीस की बाहेर काढू." हेच, दरवेळेस हेच. मग मी वर लिहिलंय ते म्हटलं आणि पुढे पुस्ती जोडली.
"त्यापेक्षा तुला पिंपात ठेवते आणि मी १९ वर्षांची झाले की बाहेर काढते." संपलं. खरं तर मी हे मनातच म्हणते नेहमी पण वर्षभर ऐकून एकदम आलंच तोंडून बाहेर. खरं सांगू? मला खो, खो हसायला येतंय आता म्हणजे मी कल्पना करतेय की आईला खरंच पिंपात टाकलं तर? एकवेळ मी राहीन पडून कितीही वर्ष पिंपात पण आई? छे, आतून पिंपाच्या झाकणावर बडवत बसेल, ’मला बाहेर काढा, काढा’ म्हणत. पिंपाला भोकं मात्र ठेवायला हवीत. श्वास घेता यायला हवा नं आणि भोकातून ठेव म्हणावं पूर्ण घरावर लक्ष. पण ते जाऊ दे. आमची खरी समस्या ही नाहीच. ही होती त्यावरची प्रतिक्रिया. मी हे असंच बोलते याला कारण आहे माझी आई. या पोनीटेलच्या सहवासाचा तिच्यावर परिणाम झालाय आणि तिच्यामुळे माझ्यावर.  आई पोनीटेलकडे काम करते.  तिथेच तिचा हा पोनीटेल काहीतरी पाचकळ विनोद करतो आणि आईला ते आवडतात. पोनीटेल हे त्याचं नाव नाही. तो पोनीटेल बांधतो म्हणून आई त्याला पोनीटेल म्हणते. माझ्या प्रत्येक प्रश्नावर, अडचणीवर आईकडे एकच उपाय, पिंपात टाकणे. जाऊ दे. पिंपाबद्दल खूप झालं.

सरळच सांगायचं तर माझा बाबा ही आमची समस्या. नाही, नाही माझा बाबा मला छळत नाही, त्रास देत नाही. उगाच कान टवकारू नका. मला ठाऊक आहे तुम्ही वाचताय पण मला वाटतंय की मी तुम्हाला सांगतेय, तुमच्याशी बोलतेय म्हणून म्हटलं, कान टवकारू नका. हे असं होत चाललंय माझं. आईसारखं. आई मला म्हणते मी विषय भलतीकडे नेते पण मी तिच्याकडूनच हे शिकले आहे पटतच नाही तिला.  तर मुद्दा असा आहे की मला असं वाटतं, माझ्या बाबाचं माझ्यावर प्रेम नाही. कदाचित तुम्हालाही पुढे मी जे सांगणार आहे त्यावरून ते लगेच पटेल, खात्री होईल.

माझ्या आईने बाबाशी लग्न केलं त्याला १० वर्ष झाली. चार वर्षांची होते मी. बाबाला त्याची आधीची दोन मुलं आहेत. मुलगे. आई त्यांना टोणगे म्हणते म्हणून मीही इथे आता त्यांना टोणगेच म्हणेन. माझ्या आईचं आणि बाबाचं, दोघांचीही ही दुसरी लग्न आहेत. पहिल्या जोडीदाराशी पटलं नाही म्हणून घटस्फोट घेऊन केलेली. माझे आई - बाबा का वेगळे झाले हे लहान असताना मला माहीत नव्हतं. दोन - दोन बाबा माझे लाड करतात याचा आनंद जास्त होता. तेच टोणग्यांचं. त्यांना दोन आया लाड करायला. एका गावात नसल्यामुळे दुसर्‍या बाबाशी कधीतरीच भेट व्हायची त्यामुळेही सर्व सुरळीत चाललं असावं किंवा आम्ही सर्वच लहान होतो त्यामुळे जाणही तितकीच. काय कारणं असतील ती असतील पण  मी मोठी होत असताना सगळं व्यवस्थित चालू होतं. कधीतरी वाढत्या वयाबरोबर वास्तव कळलं असेल. नातेवाईक आणि आजूबाजूची माणसं असतातच तुमच्या मनाचा तळ ढवळून काढायला असं आई म्हणते. काय असेल ते असेल पण गेल्या वर्षापासून मला जाणवायला लागलं की बाबा पूर्वीसारखा नाही वागत माझ्याशी. फक्त माझ्याशीच.  टोणग्यांशी त्याचं वागणं मला जास्त प्रेमाचं, जवळीक साधणारं वाटतं. आईला सांगावंसं वाटत होतं पण मी ते टोणग्यांनाच ऐकवलं. दोन्ही टोणगे माझ्यापेक्षा मोठे आहेत. दोन आणि तीन वर्षांनी. त्यांनी शांतपणे ऐकलं. एक टोणगा म्हणाला,
"तुझ्या मनाचे खेळ आहेत. उगाच काहीतरी डोक्यात भरवून घेतेस स्वत:च्या आणि आमच्या डोक्याला त्रास देतेस." दुसरा टोणगा म्हणाला,
"असेल. तसंही ते तुझे बाबा नाहीतच ना?" मला एकदम रडायलाच यायला लागलं. हेच असेल का खरं कारण? आतून कळलेलं का मला म्हणून इतक्या पटकन रडायला आलं? मला आता माझ्या स्वत:च्या बाबाकडे जावं असं वाटायला लागलं. आतापर्यंत खरंच असं कधी वाटलं नव्हतं पण जर माझ्या  बाबाला मी त्याची रक्ताची मुलगी  नाही म्हणून प्रेम वाटत नसेल तर कशाला राहायचं मी इथे? फक्त आई हवी म्हणून? तो विचार तिने करावा. हा तिढा ती सोडवू शकत नसेल तर तिच्यासाठी माझी किंमत तितकीच असा अर्थ मी काढलाय. मी रडता रडता विचार करत होते त्या वेळात टोणगे एकमेकांशी भांडायला लागले. ते तुझे बाबा नाहीतच असं एका टोणग्याने म्हणणं हे दुसर्‍या टोणग्याला क्रूरतेची परिसीमा असं काहीतरी असतं ना तसं वाटलं त्यामुळे त्यांची चांगलीच जुंपली. मी रडायचं विसरून त्यांच्या भांडणात सामील होणार तितक्यात आई डोकावलीच.
"काय चाललंय?" तिला आम्ही तिघं एकत्र असलो की भांडतो असंच वाटतं. भांडण सोडवताना ती आमच्या अंगावर  खेकसून सुरुवात करते,
"काय चाललंय?" तिने पुन्हा खेकसून विचारलं.
"ती रडतेय." दोघांमधलं कुणीतरी पुटपुटलं.
"ते दिसतंय मला. कुणामुळे रडतेय असं विचारतेय मी." कुणीच काही बोललं नाही. मला मजा बघायची होती पण माझ्या रडण्यामुळे टोणग्यांना बोलणी खावी लागणार असतील तर जाणं भाग होतं. मी रडत-रडत माझ्या खोलीत जाऊन बसले. मग वाटायला लागलं, माझी आई वागते का टोणग्यांशी चांगलं? त्यांना काय वाटत असेल? त्यांना जावंसं वाटत असेल का त्यांच्या आईकडे कायमचं? डोकं भणभणायला लागलं. या घरातून पळून जावं असंही मनात यायला लागलं. पण कुठे जाऊ? कसं जायचं? नुसतंच पळायचं की गरजेपुरतं सामान घ्यायचं बरोबर? रस्त्यावर राहिले तर सुरुवातीला लागेल इतकं? कोण देईल अधिक माहिती? एकही पळून गेलेली मैत्रीण किंवा मित्र आठवेना. काय करू खरंच? शेवटी एका मैत्रिणीलाच सांगितलं. तिला सांगायला थोडीशी भिती वाटत होती. तिने तिच्या आईला सांगितलं तर माझ्या आईला सांगणारच ना ती. पितळ उघडं पडेल लगेच. मैत्रीण म्हणाली,
"तू तुझ्या बाबांशीच बोल ना नाहीतर आधी आईशी बोल."
"नाही बोलायचं मला त्या दोघांशी या विषयावर." मैत्रीण माझ्यासारखीच आहे ती तटकन म्हणाली,
"मग जा पळून."
"कुठे जाऊ त्याचं उत्तर दे. तू येतेस माझ्याबरोबर? मजा येईल. नाहीतर पळायला मदत तरी कर."
"मूर्ख आहेस. तुझ्या भावाचं बरोबर आहे. काहीतरी डोक्यात भरवून घेतेस. ते काढ. वेगळा चष्मा घाल डोळ्यावर."
"आणि काय करू?"
"अगं जसा आपला दृष्टिकोन तसं समोरचं दिसतं असं तुझ्याच आईकडून ऐकलंय मी खूपदा."
"ते काय लक्षात ठेवतेस तू? पोनीटेलकडे काम करता करता ती पोनीटेलचे सल्ले आणि विचार स्वत:च्या नावावर खपवते." तिला उडवून लावलं मी पण नंतर खरंच मी बदलायला हवं का असं वाटायला लागलं. पण म्हणजे मी नक्की करायचं काय? बदल मला झेपेल? मुळात बाबा सांगतो ते मी करते, त्याच्याशी उगाच वाद घालत नाही; हे मी का सांगतेय कारण आईला वाटतं मी वाद घालण्यात फार पटाईत आहे. सत्य असं आहे की मी वाद घालायला सुरुवात करते ते त्यांच्यामुळेच. कोणत्याही विषयावरची या दोघांची मतं ऐकली की धक्काच बसतो मला. या मोठ्या लोकांची विचित्र मतं फारच विचित्र आहेत. मागासलेले नुसते. असा कसा विचार करतात? अविश्वसनीय. त्यांची मतं, म्हणणं सगळंच चुकीचं असल्यामुळे खोडून काढणं भाग असतं.  मी मतं खोडून काढायला सुरुवात केली की आई थांबवते. तेवढं सोडलं तर मी नीट वागते, शाळेत काय झालं ते सांगते, त्याच्या कामातही मदत करते लहर आली की. तोही ऐकतो सगळं, करतोही सारं माझ्यासाठी पण ’आय लव्ह यू’ म्हटलं की जबरदस्ती ’आय लव्ह यू टू’ म्हणतो. कधीकधी तर उत्तर न देताच निघून जातो. हे फक्त माझ्याशी. आईशी आणि टोणग्यांशी त्याचं वागणं नेहमीसारखंच आहे. एकदा न राहवून मी विचारलंच त्याला,
"बाबा, मी आवडत नाही का तुला?"
"आवडतेस." फोनमधली मान वरदेखील काढली नाही त्याने. ’आम्ही हेच केलेलं चालत नाही तुम्हाला’ असं पुटपुटत मी टक लावून त्याच्याकडे बघत राहिले. त्याची मान वर झाली नाही.
"आम्हाला व्याख्यान ऐकवता फोनमध्ये डोकं खुपसलं की." मी जोरात म्हटलं. तो वैतागला.
"बोल." कपाळावर आठ्या घालत त्याने माझ्याकडे पाहिलं.
’स्वत:च्या टोणग्यांकडे बघतोस का असा कधी? सारखं ’आय लव्ह यू चालू असतं.’ मी मनातल्या मनात धुमसत होते. प्रत्यक्षात गप्प राहिले. निघूनच गेले तिथून. जाताना तो किती वाईट आहे याची उजळणी केली मनात. मला माझा बाबा माझ्यावर प्रेम करत नाही हे लक्षात आल्यापासून त्याच्या सगळ्या वाईट सवयी अगदी प्रकर्षाने जाणवायला लागल्यात. उठसूठ ढेकर देत असतो, एकदा शिंकायला लागला की झालं; थांबतच नाही. लहान असताना आम्ही सगळे मोजायचो शिंका. आता दिलं सोडून. कळकट बनियन आणि चिटुकली चड्डी आणि पादणं...शी, शी, शी काय सांगतेय मी हे. माझ्या वयाला शोभत नाही पण इतकी चिडलेय मी की हे सगळं जगाला ओरडून सांगायची माझी तयारी आहे. मला माझा बाबा ’कूल’ पाहिजे पण त्याला काय फरक पडतोय. मुळात तो मला त्याची मुलगी समजतच नाही त्यामुळे कशाला माझ्यासाठी तो त्याच्या सवयी बदलेल? आता काहीतरी करायला हवं. आहे हे स्वीकायरायचं इतकंच उरलंय की काय माझ्या हातात? का सापडेल मला मार्ग?

"मला माझ्या बाबाकडे जायचं आहे कायमचं राहायला." मी आईसमोर जाऊन उभीच राहिले. मला वाटलं आता स्फोट होईल. तसं झालं नाही. चला, म्हणजे आईसुद्धा बाबाला सामील. ही ब्याद कधी टळते असं हिलाही वाटतंय की काय? माझे डोळे भरून आले. आई शांतपणे म्हणाली,
"तू तुझ्या बाबाकडेच आहेस. खूळ काढून टाक हे डोक्यातून."
"खूळ? मला हे सांगतेस तसं बाबाशी बोललीस का?"
"बोलले."
"मग?"
"मग काय? त्याला नाही वाटत तसं."
"त्याने ते मला सांगायचं ना? दुसरं म्हणजे तोंडाने बोलून काय उपयोग, वागण्यात दिसायला हवं."
"तू विचार हे त्याला. नाहीतर असं करू आपण सगळे बसू आणि बोलू. हल्लीच घेतलं आहेस तू हे काहीतरी तुझ्या मनात."
"आधी कळलं नव्हतं. उशिरा आलं लक्षात."
"असं कसं अचानक बदलेल? तुझा दृष्टीकोन बदललाय. बाबाच्या प्रत्येक कृतीत तू अर्थ शोधायला सुरुवात केली आहेस हल्ली."
"टोणग्यांवर तू तरी करतेस का प्रेम? ती तुझी थोडीच आहेत." मी अगदी तिच्या मर्मावर बोट ठेवलं. माझंच चुकलं म्हणत राहते. आता कर विचार माझ्या प्रश्नावर.
"बास हं. अती झालं हे." त्या दोघांना टोणगे म्हणण्याचा अधिकार तिचाच असल्यासारखं आई चिडली आणि नेहमी बोलते तसं तेच तेच परत बोलत राहिली. आईला उसकवलं म्हणून मला बरंच वाटलं. घरातल्या सर्वांना असाच त्रास द्यायचं मी ठरवलंय. तिची ’टेप’ थांबल्यावर मी म्हटलं,
"टोणग्यांवर तू प्रेम करतेस का हा प्रश्न चिडण्यासारखा नाही तर स्वत:च्या मनात डोकावून पाहायला हवं असं वाटण्यासारखा आहे. माझ्या मनात हे खूळ आलंय तसं त्यांच्या मनातही येऊ शकतं ना?"
"येऊ शकतं पण मला नाही वाटत ती दोघं तुझ्याइतकी चक्रम आहेत." आईने संभाषण थांबवलंच.
आमच्या घरातलं वातावरण माझ्या या खुळामुळे बदललं असं प्रत्येकालाच वाटतंय. आई तर हवालदिल झाली. इतकी वर्ष त्या दोघांनी एकमेकांची मुलं आपली मानली, भेदभाव केला नाही आणि आता हे काय भलतंच? असं तिला वाटत होतं. बाबा तर घरातच टिकेनासा झाला. माझ्याशी बोलायचीही त्याची तयारी नव्हती. मी प्रयत्न केला तेव्हादेखील तेच उत्तर.
"तुझ्या मनातल्या खेळांना मी काही करू शकत नाही. चार वर्षांची होतीस तू या घरात आलीस तेव्हा. त्या क्षणापासून मी तुला माझीच मुलगी समजतो. आता ते सारखं कसं दाखवून द्यायचं मला ठाऊक नाही आणि इच्छाही नाही." तो हुप्प होऊन माझ्याकडे बघत राहिला. मला वाटलं त्याचे गाल ओढावे आणि कुशीत शिरावं पण माझ्या भावनांना खूळ म्हणणार्‍या लोकांचा मला आता प्रचंड राग यायला लागलाय. बाबाच काय, कुणीच माझ्यावर प्रेम करत नाही असं  वाटतंय. मला आता या विषयावर कुणाशीही बोलायचंच नाही. तशी आता किती वर्ष राहिली आहेत या घरातून बाहेर पडायची. शिक्षण संपलं की यांचा संबंध संपला. माझी मी कमावेन आणि खाईन पण या माणसांचं तोंड पुन्हा बघायचं नाही. मनातल्या मनात मी दृढनिश्चय केला तेवढ्यात आई आली. नको तेव्हा ती टपकतेच नेहमी.
"चल. लगेच निघायचं आहे."
"कुठे?"
"तू चल तर खरी." आईने जवळजवळ मला फरफटतच घराबाहेर काढलं. काय करणार आहे ही माझं? एकदा एखाद्याचं प्रेम उडालं की माणूस कुठल्याही थराला जातो...!


"तुझी आई मला तुझ्याबद्दल रोज सांगते." आईने मला पोनीटेलसमोर आदळलं. मी रागाचा कटाक्ष आईकडे टाकून निर्विकारपणे पोनीटेलकडे पाहत राहिले.
"ऐकलंस का?" त्याने मृदू स्वरात विचारलं.
"ऐकलं. तुमच्याबद्दलपण ती आम्हाला रोज सांगते." कुसकटपणे मी म्हटलं.
"अरे वा. चांगलंच बोलते ना?" मी उगाचच द्विअर्थी मान हलवली, त्याला त्याचा काहीच फरक पडला नाही.
"पिंपाचा विनोद सांगते. पाठ झालाय आमचा." मी तसं रागानेच म्हटलं हे पण ते दोघं आयुष्यात पिंपाचा विनोद पहिल्यांदा ऐकल्यासारखे हसले. मी ढिम्म. अखेर पोनीटेल म्हणाला,
"हे बघ. मला सगळं ठाऊक आहे त्यामुळे आधी उपाय काय ते सांगतो मग तू तुझं म्हणणं सांग. उलट्या पायर्‍या चढू." मी काहीच बोलले नाही तसं त्याने उलट्या पायर्‍या चढायला सुरुवात केली.
"तू आता किती वर्षांची झालीस?"
"चौदा." गुरकावल्यासारखं मी उत्तर दिलं.
"तुझी पाळी कधी सुरू झाली?" मी आईकडे डोळे मोठे करून पाहिलं. माझ्या पाळीशी माझ्या समस्येचा काय संबंध? आई शांत होती म्हणून नाईलाजाने उत्तर दिलं.
"गेल्यावर्षीपासून."
"म्हणजेच तुझ्या शरीरात बदल होत चालले आहेत. यौवनावस्था म्हणतात याला."
"शिकलेय शाळेत." हेच ऐकायला आले की काय इथे? म्हणजे माझ्या वागण्याला मीच जबाबदार. चिडणं, आक्रस्ताळेपणा, निराशा असं काय काय होतं म्हणे या वयात त्यामुळे या बदलाशी जुळवून घेताना काही प्रश्न निर्माण होऊ शकतात असं शाळेत शिकलेलं भलंथोरलं वाक्य पाठ झालंय. हे इतकं सगळं सांगण्याऐवजी दोन शब्दांत मी उत्तर दिलं.
"तू शिकली आहेस पण तुझा बाबा नाही. त्यामुळे तुला जे वाटतंय त्याला तू जबाबदार नाहीस. तुझ्या आईला वाटतंय तसं हे खूळ नाही." पोनीटेल काय म्हणतोय ते कळलंच नाही मला क्षणभर. प्रकाश पडला तसं मला खुर्चीतल्या खुर्चीत टुणकन उडी मारावीशी वाटली. उडी मारली नाही पण माझा चेहरा खुलला.
"बाबाचं प्रेम नाही हे बरोबर आहे ना?"
"नाही. ते साफ चुकीचं आहे पण तुझे बाबा तुझ्याशी जे वागतायत ना त्याचं कारण तुझं वय आहे."
"अं?" पोनीटेल सल्लागार आहे हे ठीक पण इतकं गहन कशाला बोलायचं? माझ्या चेहर्‍यावरचे भाव वाचत तो म्हणाला,
"तुझ्या बाबाला तुझ्या शरीरातल्या होणार्‍या बदलामुळे थोडंसं अवघडलेपण आलंय. त्याचं तुझं रक्ताचं नातं नाही हेही कारण असेल पण तेच एक कारण असेल असं म्हणता येणार नाही. सख्ख्या नात्यातही हे होतं. नकळत होतं. मला खात्री आहे तुझ्या बाबाला स्वत:लाही हे कळलेलं नसेल."
"खरंच? म्हणून तो चार हात दूर राहत असेल माझ्यापासून? तुम्ही त्याला सांगाल समजावून?" मला आत्ता याक्षणी बाबाला इथे आणावं असं वाटत होतं.
"ते येणार नाहीत कारण ते तुझ्यावर प्रेम करतात यावर ते ठाम आहेत. ही समस्या नसून हे तुझ्या डोक्याने घेतलेलं खूळ आहेत हेच त्यांच्या मनाने घेतलंय."
"मी जाते लगेच घरी. तुम्ही जे सांगितलंत ते सांगेत." मी उतावीळ झाले.
"नको. लगेच नको. आधी मी सांगतो ते अमलात आणू. नंतर हा बदल तुझे बाबा कसा स्वीकारतात ते पाहा. एकदा का तुझं मन शांत झालं की जे आपण बोललो ते सांग तुझ्या बाबांना. चालेल?" पहिल्यांदाच मला पोनीटेलने स्वत:च्या तोंडून पिंपाचा विनोद पुन्हा सांगितला तरी चालेल असं वाटलं. मी आनंदाने पोनीटेल सांगेल ते करायचं ठरवलं. येताजाता बाबाला, ’आय लव्ह यू’ स्वत:हून पुढाकार घेऊन  म्हणायचं अगदी लगेच ठरवलं. माझी तक्रार तीच होती ना की तो कधीही स्वत:हून हे म्हणत नाही. यापुढे मी ’आय लव्ह यू’ म्हणून थांबणार नाही, त्यालाही उलट म्हणायला लावेन. पोनीटेल म्हणाला, ’पुरुषांना भावना  व्यक्त करणं जमत नाही. ते तुमच्यासाठी सतत काही ना काही करत राहतात. तेच त्याचं प्रेम असतं. ते एकदा ओळखता आलं की झालं.’  मला ते पटलं. आतापर्यंत त्याने माझे सगळे लाड पुरवले. मला शाळेत तोच सोडतो, अभ्यास घेतो, माझं जगाबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून माहिती देतो, पुस्तकं भेट देतो...अशा अनेक गोष्टी करतो. आता फक्त त्याला प्रेम बोलून दाखवायला शिकवायचं होतं. आता तुम्ही म्हणाल, तुझ्या बाबांचं प्रेम आहे हे कळलं हे खूप नाही का? खरं आहे पण मला आवडतं प्रेम व्यक्त केलेलं, शब्दांनी व्यक्त केलेलं प्रेम! मुलीचा इतका हट्ट बाबाने पुरवला तर बिघडतं कुठे? मी मोठी होतेय, माझ्या शरीरात बदल होतायत यामुळे त्याच्या नकळत तो माझ्यापासून दूर जात असेल तर पोनीटेलने सांगितलेलं काम अगदी सोपं होतं.  माझ्या मनावरचा ताण एकदम नाहीसा झाला. कधी नव्हे ती आई मला आवडली आणि पोनीटेलही. पोनीटेलचा निरोप घेऊन मी आईसह घरी निघाले. घरी गेले की मी बाबाला घट्ट मिठी मारणार आहे. हो, हो. पोनीटेलने हळूहळू पावलं टाकायला सांगितली आहेत ते आहे लक्षात. बाबा नक्कीच अवघडून जाईल माझ्या मिठीमुळे पण मला आता कारण कळलंय ना त्यामुळे मला राग न येता हसायलाच येईल. तो चिडेल पण होईल सवय  आणि जाईल त्याचं अवघडलेपण.  माझ्या नजरेसमोर दिसतंय मला  दृष्य. आता मी अगदी उतावीळ आहे झाले आहे. एका नविन बदलासाठी माझ्या बाबाला तयार करायला. नव्याने आमचं नातं रुजवायला!

माझा मराठीचा बोल (मामबो) दिवाळी अंक २०१९ मध्ये प्रसिद्ध.

Monday, October 28, 2019

आंतरजालीय दिवाळी अंक - माझी कथा - संकोच

मराठी माणसाचा नादिष्टपणा काय करायला लावेल ते सांगता येत नाही. मामबोकरांच्या (माझा मराठीचा बोल)डोक्यात अंकाचं ’खूळ’ तीन वर्षापूर्वी आलं. पहिले दोन अंक ’आपले आपण’ सदरात मोडणारे होते. यावर्षी  ’आंतरजालीय अंक’ काढायचं ठरलं. 
अंक वाचनीय आहे. भारत आणि अमेरिकेतल्या लिहित्या हातांचं दर्जेदार साहित्य या अंकात आहे. तुम्हाला तिथली अक्षरं वेगळ्या दुनियेत घेऊन जातील याची खात्री वाटते. वाचा आणि प्रतिक्रिया नोंदवून आमचा उत्साह वाढवा. - https://www.mambodiwali.com

या अंकासाठी मदत करत असताना नकळत आठवण झाली ’अस्मिता’ त्रैमासिकाची. केरीमध्ये राहत असताना ’अस्मिता’ नावाचं त्रैमासिक आम्ही काढायचो. या उत्साहाच्या परिणीती म्हणजे, आज तिथल्या नगरवाचनायात शेकड्यांनी मराठी पुस्तक उपलब्ध आहेत. 
या अंकातील माझ्या कथेत लहान मुलीचं विश्व आहे. तिच्या नजरेतून तिला दिसणारे तिचे सावत्र वडील आहेत. दोघांच्या नात्यातला भावनिक गुंता हलक्याफुलक्या स्वरुपात सोडवला आहे. हा प्रवास सुखद वळणापाशी कसा पोचतो त्याची ही कथा... वाचताय ना? वाचून तिथे प्रतिसाद नोंदवायला विसरु नका:

Tuesday, November 13, 2018

दुकान, गिरण आणि...

अनुराधा २०१८ दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध
काटकुळ्या शरीरयष्टीचा त्रिंबककर पिशवी हलवत बाजारातून साहेबांच्या घराकडे निघाला. रस्त्याच्या कडेने सवयीने अंग चोरत तो पावलं टाकत होता. चालता चालता ’थूऽऽऽ...’ विचित्र आवाज करत पान कोंबलेल्या तोंडानेच तो रस्त्याच्या बाजूला थुकला. त्याचे एक दोन थेंब फाटक्या विजारीवर उडाले. त्याला दु:ख झालं. घरी गेल्यावर कैदाशीण जिवंत ठेवणार नाही याची त्याला खात्री होती. थुकी लावून ते छोटे ठिपके त्याने घालवायचा प्रयत्न केला पण विजार आणखीनंच रंगली. काय करावं ते त्याला कळेना तितक्यात कुणीतरी त्याच्या पाठीवर जोरात थाप मारली. त्याचं बारकुळं शरीर हादरा बसल्यासारखं डळमळलं. कसाबसा त्याने तोल सांभाळला. पुढे आलेले दात दाखवत वर्दमशी तो दोन शब्द बोलला आणि मार्गाला लागला. साहेबांची बायको त्याच्या बायकोच्या वरताण होती. उशीर झाला भाज्या आणायला तर उशीराबरोबर तिने त्याचं अजागळासारखं राहणं, सतत पान खाणं, त्याच्यावर होणारा खर्च, आजार सगळी जंत्री लावली असती. आणि साहेबांची हरामखोर कार्टी आणि तिच्याबरोबरची  क्वार्टर्समधली माजोरडी पोरं; त्याला ठाऊक होतं त्याची पाठ फिरली की सगळीच त्याच्या दुडक्या चालीची खिल्ली उडवतात. त्याची मुलं असती तर तुडवून काढलं असतं त्याने. तो भराभर पाय उचलायला लागला.  साहेबांच्या घरी भाजीची पिशवी आपटली की घरी जाता येणार होतं. वाटेत एक दारुची बाटली ढोसली की झालं. भाजीच्या पैशातले तसे त्याने बरेच पैसे ढापले होते. त्या पैशातून पहिल्या धारेची घेता आली असती.  मळकट लेंग्याच्या खिशात हात घालून त्याने नोटा चाचपडल्या आणि बंगल्याच्या दिशेने तो चालत राहिला. बंगल्यावर पोचल्यावर साहेबांच्या बायकोने तोंड सोडलंच,
"त्रिंबककर, किती वेळा सांगितलं भाजी निवडून घ्यायची. कुसलेली आहे सगळी." त्रिंबककर रंगलेले दात दाखवून ओशाळवाणं हसत राहिला. खरं तर त्याला म्हणावंसं वाटत होतं, ’अगं बये, तू कर  बाजार इतकी मस्ती असेल अंगात तर. तुजा घोव सरकारचा नोकर, मी त्येचा. पन घरगड्यागत राबवते तू मला महामाये.’ पण नेहमीप्रमाणे त्रिंबककरने ते शब्द मनातल्या मनात गिळून टाकले. त्याचं सगळं लक्ष खिशातल्या नोटांकडे लागलं होतं. एकदा दारुची बाटली तोंडाला लागली की त्याचा जीव शांत होणार होता.

साहेबांच्या घरातून बाहेर पडायला सात वाजले. दिव्यांच्या अंधुक प्रकाशात रस्ता पिवळसर दिसत होता. नगरपरिषदेचा भोंगा वाजायला लागला तसा त्रिंबककर वैतागला. काय सारखा ठणाणा बोंबलतो हा भोंगा. तो मनातल्या मनात कुरकुरला. त्याने पुन्हा एकदा पैसे चाचपले.  साटम दिसल्या दिसल्या धूळ झटकत लेंग्याला हात पुसून तो पारावर साटम शेजारी बसला.
"बाटली आन्लीस का?" बसल्याबसल्या त्याने कुजबूजल्यासारखं विचारलं.
"आनली. तीस दे."
"इतकं न्हाईत." त्रिंबककरने दहाच्या दोन नोटा त्याच्या हातात कोंबल्या. साटमने त्रिंबककरला देण्याआधी बाटली तोंडाला लावली. पाव बाटली संपवल्यावर त्याने ती त्रिंबककरच्या हातात ठेवली. त्रिंबककर खिक्ककन हसला.
"दहा रुपयाची नरड्याखाली घातलीस नव्हं. तिच्यामारी." पण दारु प्यायला कुणीतरी बरोबर आहे यामुळे तो खूश होता. दोघं सुखदुखा:च्या गोष्टीत रंगून गेले. सायबाच्या घरात त्याच्या बायकोने सर्वांना कसं ताब्यात ठेवलंय हे सांगताना त्रिंबककरला हसू आवरत नव्हतं. साटमने सुद्धा बिगारीची कामं करणारी भिकू सातपुतीण कंत्राटादाराला ’लागू’ आहे याचे असंख्य पुरावे दिले. बायकांना वेळीच आवरलं नाही तर त्या मोकाट सुटतात यावर दोघांचं एकमत झालं. दोघंही आपल्या बायकांना आपण कसं त्याब्यात ठेवलं आहे याबद्दल बढाया मारत राहिले ते साटमची बायको तिथे येईपर्यत.
"मुडदा बसवला मेल्या तुजा. गिलायचं हाय का न्हाय? कोन आननार रं बाजार आजचा?..." पारावर बसलेल्या टोळक्याच्या नजरा त्या तिघांच्या दिशेने वळल्या. बायकोची टकळी थांबणार नाही हे ठाऊक असूनही साटम तसाच बसून राहिला. साटमच्या बायकोचं डोकं फिरलंच. तिने त्याच्या हातातली बाटली हिसकावली आणि तिथेच पारावर आपटली. साटम लगबगीने उठला. बाटलीतली दारु आधीच संपविल्याचा त्याला आनंद झाला. त्याच्या चेहर्‍यावरची सार्थकता त्रिंबककरने ओळखली. त्याने तोल सांभाळत उठलेल्या साटमकडे मिश्किल नजरेने पाहिलं. त्यांची नजरानजर साटमच्या बायकोने पकडलीच. तिने त्रिंबककरकडे जळजळीत कटाक्ष टाकला. त्रिंबककरने मान खाली घातली.
"चला..." ती साटमवर खेकसली. ती पुढे, आणि तिच्या मागे भेलकांडत जाणार्‍या साटमकडे पाहत पारावरच्या टोळक्याची  थोडावेळ करमणूक झाली. त्रिंबककरही पाय हलवत तिथेच बसून राहिला ते त्याचा मुलगा येईपर्यंत.
"बाबा, आई वाट बघतेय केव्हाची." स्वत:ला सावरत त्रिंबककर कसाबसा उठला. राजेश आला की त्रिंबककरला धास्तावल्यागत होई. मुलाची सरबत्ती सुरु होण्याआधीच ताठ उभं राहण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला,
"शान्यसारकं वागायचं. व्हय ना? आता वागनार हाय मी शान्यासारका."  तोल सावरत, दात दाखवत, लटपटत तो राजेशबरोबर चालायला लागला. "दारु पियाची नाय, व्यसन हाय ते. मानूस मरतं. आनि परमानिक आसलं की टाईम लागला तरी सगलं चांगलं व्हनारच. व्हय ना? माजी गिरन व्हनार, दुकान बी व्हनारच." त्रिंबककरचं बरळणं चालूच होतं. "बाला, ए बाला,  तुला तुजा मास्तर ना कायबी सिकवतो. फकस्त वंगालच व्हतं परमानिक मानसांचं."  चालता चालता राजेशच्या हातातला हात सोडवायचा त्रिंबककर प्रयत्न करत राहिला. पण राजेशची पकड घट्ट होती. चाळीपाशी आल्यावर राजेशनेच त्रिंबककरचा हात सोडला. रॉड्रीक्सच्या चाळीत कालवणाचा घमघमीत वास पसरला होता. त्याची भूक चाळवली. आत जाऊन त्याने फतकल मारली. बायकोने त्याच्यापुढे ताट आपटलंय हेही त्याच्या लक्षात आलं नाही.  तो बकाबका खात सुटला. आता यापुढे एकही घास खाता जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याचं लक्ष सुका भात चिवडणार्‍या दोन्ही मुलांकडे आणि बायकोकडे गेलं. तो ओशाळला.
"तुमचं जालं नवतं व्हय." तो दात दाखवत हसत म्हणाला. त्रिंबककर कसाही हसला तरी ते केविलवाणंच वाटायचं.  धर्मेन्द्र त्या हसण्याने वैतागला.
"कदीच कसी आमची प्वाटं दिसत न्हाइत रं तुला?" केसाची झुलपं वाढवलेल्या धर्मेन्द्रकडे त्रिंबककर पाहत राहिला. ’आक्सी धरमिदंरवानी दिसतु लेकाचा.’ त्याला कौतुक वाटलं.  त्याच्या तरुणपणी टुरींग टॉकीजमध्ये जाऊन राजेश खन्ना आणि धर्मेन्द्रचे पिक्चर पाहायचा तो. एकदोन वेळा त्याने आपल्याला त्यांच्यासारखंच बनायचंय असं त्याच्या मित्रांना बोलूनही दाखवलं होतं. त्यावरुन कितीतरी दिवस त्याला सगळे चिडवायचेही. पण धर्मेन्द्र व्हायला नक्की काय करायचं ते ठाऊक नव्हतं त्यामुळे त्याने तो नाद सोडून दिला होता. मुलं  झाल्यावर मात्र त्याने राजेश आणि धर्मेन्द्र नावं ठेवली मुलांची.
"तू  धरमिंदरवानी दिसाया लागला रं." कौतुकाने तो म्हणाला.
"उगाच चढवू नका बाबा त्याला." राजेश वैतागला.
"तू गप रे. सालत जातो तर लइच सिकवायला जातो सारका." धर्मेन्द्र खेकसला. राजेशने दुर्लक्ष केलं.  त्रिंबककरच्या मनात काहीतरी घोळत असावं. तो धर्मेन्द्रला म्हणाला,
"तुजी साला न्हाय ना. मग उद्या सायबाकडं कामाला ये माज्याबरुबर. जादाचं काम हाये उद्याच्याला." धर्मेन्द्रने नकारार्थी मान हलवली.
"तू सालंत जातोस म्हनून इचारत नाइ मी. पण तू जमवसील का?" राजेशला नाही म्हणावंसं वाटत होतं. उत्तर न देताच तो पानावरुन उठला. त्रिबंककर त्याच्याकडे पाहत पुटपुटला.
"इचित्रच हाय हा पोरगा. सायबाकडं चल म्हटलं की टकुरं पिरल्यागत करतो." पिरताला राजेशच्या मागून उठून जावंसं वाटत होतं पण ताटातला उरला सुरला भातंही त्रिंबककरच्याच पोटात जाईल या काळजीने ती उठली नाही.

स्वयंपाकघरातल्या ट्रंकेवर बसून राजेश विचारात गढला. साहेबांच्या घरी कामाला जाणं म्हणजे संकट वाटायचं त्याला. बागेची, माळ्याची स्वच्छता, फांद्या कापायच्या असं काही ना काही काम असायचं. त्रिंबककरला मदत करायची त्याची तयारी होती पण साहेबांची मुलगी त्याच्याच वर्गात होती आणि साहेबांच्या बायकोचं अतिकौतुक त्याला अजीर्ण व्हायचं. राजेश परिस्थिती समजून घेऊन कामं करतो आणि आपल्या लेकीला कशाची किंमत नाही हे उगाळत राहणार हे ठरलेलं. दोघं कानकोंडे होऊन जात. पण बाबांना नाही म्हणणंही नको वाटत होतं. चार पैसे हातावर टेकवत होती साहेबांची बायको, झालंच तर आईसाठी एखादी जुनी साडी मिळेल हे  ठाऊक होतं राजेशला. हे सारं, तिचं उतू जाणारं कौतुक टाळायचं म्हणून नाकारायचं का आतापर्यंत दाखवला तसा कोडगेपणा दाखवायचा? काही झालं तरी त्याला आता लवकर  मोठं व्हायचं होतं. परिस्थितीपासून सुटका करुन घ्यायची होती. स्वत:ची, जमलं तर घरातल्या सगळ्यांची. नाहीतर फक्त त्याची आणि आईची तरी. दारुड्या बापाबद्दल त्याला आस्था नव्हती आणि मटक्याचा नाद लागलेल्या धर्मेन्द्रपुढे त्याने हात टेकले होते.  तो विचार करत बसून राहिला. तेवढ्यात धर्मेन्द्र समोर येऊन उभा राहिला.
"तू बस  बेवड्याबरोबर  फालतू कामं करत. दुकान आनि गिरन टाकायची हाय त्येला. पैका लागतो त्ये ठाव हाय ना? मी मटक्यात पैका मिळाला की चाललो मुंबयला. खरा धरमिंदर व्हतो की नाय बग."
"जा." रुक्ष स्वरात राजेश म्हणाला.
"राजेस, या सिक्सनाने तुजं काय बी भलं व्हनार न्हाय. दहावी पास ला कोन नाय इचारत."
"मी पुढे शिकणार आहे."
"पैका लागतो. हाय का तो आपल्याकडे. बगू. हात पुडं कर."
"नाही." धर्मेन्द्रने त्याचा हात ओढलाच. काही कळत नसतानाही राजेशच्या हातावरच्या रेषा निरखीत तो म्हणाला,
"वंगाल हाय तुजं नसीब. दरिद्री बापाच्या पोटी जलमलास आनि  इमलं बांदतोय सायेब व्हन्याचे."
"धर्म्या, तू जरा नीट बोल रे. पाचवीपर्यंत शिकलायस ना? काय ही भाषा."
"गप ए. उचकवू नको हा मला. मी कसाबी बोलन. तू न्हाय मला सिकवायचं.  समजलं ना." धर्मेन्द्रच्या मग्रुरीने राजेश वैतागला.
"पुरे मग. बोलूच नकोस काही. बाबांच्या पण डोक्यात असंच खूळ होतं नट व्हायचं. जे त्यांनी केलं तेच तू करु नकोस धर्म्या. डोळे उघड. कामाला लाग." धर्मेन्द्र खी खी करुन हसला. बाजूलाच भिंतीला टेकून त्यांचं संभाषण ऐकणार्‍या पिरताचं मस्तक फिरलं.
"टकूर्‍यात हानीन हा धर्म्या. राजेस सांगतोय ते घे मनावर. रस्त्यावर चल खडी टाकायला. मुकादमाशी बोलते मी. नट व्हायाचं म्हनं. तो येडा बग.  नट व्हनार व्हता. दारुड्या जाला आनि सगल्या आयुक्शाचा पिक्चर केला मुडद्यानं. आता गिरन खोलनार आनि दुकान चालवनार म्हनत गावभर फिरत असत्यो." पिरताची बडबड चालूच राहिली.  त्रिंबककर खोलीत डोकावला तसं दारुच्या भपकर्‍याने त्या एवढ्याशा खोलीला विळखा घातला. धर्मेन्द्रने नाकावर हात धरला. त्रिंबककरने त्याच्या नाकावरचा हात बाजूला ओढला.
"बापाला हिनवतोस? साल्या, एक दिवस तुजा बाप पैक्याची पोती आनल. माज नाय करायचा. समजलं काय? मा - ज करायचा नाय. दुकान जालं की सेट व्हसील तू. गिरनपन आसल." त्रिंबककरच्या तोंडातून शब्द धड बाहेर पडेनासे झाले तसं नाईलाज झाल्यागत तो आडवा झाला.  तिघंही त्या खोलीतून बाहेर पडले. बाहेरच्या खोलीत संतरजी घालून अंग टाकलेल्या तिघांना त्रिंबककरच्या घोरण्याच्या आवाजात कधीतरी झोप लागून गेली.

जड झालेलं डोकं कराकरा खाजवीत त्रिंबककर उठला. राखुंडीने दात चोळता चोळता त्याचं  विचारचक्र चालू झालं. वैतागला होता तो या आयुष्याला. कसलं सालं आयुष्य हे? नट होता आलं नाही. आता हे कुत्र्यासारखं जीणं. कशाला? कुठूनतरी पंचवीस हजाराची व्यवस्था व्हायला हवी. किराणामालाचं दुकान टाकायचं.  शेठसारखं बसायचं. मुलं आणि बायको पण दुकानातच काम करतील. बाजूला गिरण. बास. आता हेच करायचं. पैशाची व्यवस्था करायची आणि मग राजावाणी जगायचं. खळखळून चूळ भरताना मनातल्या या विचारांनी त्याला ताजतवानं केलं.
"चला." राजेश तयार होऊन उभा होता.
"कुटं?" त्रिंबककरने आश्चर्याने विचारलं.
"साहेबांकडे. काल म्हणाला होता ना तुम्ही." त्रिंबककर एकदम भानावर आला.
"हा. हा ते होय. सालंत न्हाय जायाचं का तुला?"
"काम झालं की तिकडूनच जाईन." काही न बोलता दोघं निघाले. वाटेत त्रिंबकरला राहवलं नाही. त्याने दुकान, गिरण सगळे बेत राजेशला पुन्हा सांगितले.
"आपन लइ गरीब मानसं पन सपान बगायला  पैका नाय पडत." केविलवाणं हसून त्याने पुस्ती जोडली. राजेशला गहिवरुन आलं.
"कधीतरी आपलं स्वप्न पूर्ण होईल. स्वप्नं पाहणं जसं आपल्या हातात असतं तसंच पूरं करणंही. नेकीने काम करत राहिलं की पाहिजे ते मिळतं बाबा. दारुचा नाद सोडा तुम्ही तरच या स्वप्नांना अर्थ आहे..." त्रिंबककरला राजेश काय बोलतोय ते पचवणं जड गेलं. पण नेहमीसारखंच काहीतरी भारी बोलला असणार पोरगा याची त्याला खात्री होती. त्याच्या दुडक्या चालीत उत्साह संचारला. दोघंही आपापल्या बेतांची मनात उजळणी करत साहेबांच्या घरी कामं करत राहिले. राजेशला साहेबांच्या मुलीची चाहूल लागली की थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं पण ती तिच्याच नादात होती. शाळेतही कधी तिने कुणाला सांगितलं नव्हतं तो त्यांच्या घरी कामाला येतो ते. आता फक्त तिच्या आईचं व्याख्यान नको अशी मनोमन प्रार्थना केली त्याने. पण वेळ आल्यावर निर्विकार मनाने सगळी बडबड त्याने कानाआड केली. शाळेत न जाता आईसाठी दिलेली साडी आणि पैसे घेऊन घराच्या दिशेने तो धावत सुटला. त्रिंबककर आनंदाने खुललेला राजेशचा चेहरा मनात साठवत कामाला लागला. दिवसभर कामाच्या नादातही किराणा मालाचं दुकान टाकायला पैसे कुठून आणायचे याचाच विचार चालू होता त्याच्या मनात.

संध्याकाळी पारावर बसलेल्या साटमलाही त्याने अनेकदा सांगितलेला बेत पुन्हा सांगितला. बराचवेळ मनातलं स्वप्न शब्दांनी तो स्वत:च्या, साटमच्या डोळ्यासमोर उभं करत राहिला.  साटमला आधीच चढली होती. आणखी रिचवत तो मान डोलवत राहिला. लांबून त्याला त्याची बायको दिसली तसा त्याने तिथून पळ काढला. त्रिंबककर बसून राहिला. काळोखात पार बुडून गेला तरी त्याला तिथून उठण्याची इच्छा होईना. पारावर कुणीच उरलं नव्हतं. तो रस्त्याकडे नजर लावून बसला. तुरळक गाड्यांची ये - जा आणि अधून मधून जाणवणारा पायरव. बाकी सारं शांत होतं.  पेंगुळलेला त्रिंबककर मध्येच रस्त्यावरुन जाणार्‍या गाडीच्या आवाजाने दचकत होता. शेवटी त्याने आपलं अंग पारावर टाकलं. पारंब्यांच्या काळोखात दिसणार्‍या विचित्र आकारांकडे तो कपाळावर हात टेकून पाहत राहिला. आपसूकच त्याचे डोळे मिटले. घाबरुन तो जागा झाला ते किंचाळीच्या आवाजाने. काहीतरी भयानक स्वप्न पडलं असं वाटलं त्याला. कसाबसा तो बसता झाला आणि रस्त्यापलिकडचं दॄश्य पाहून त्याचा बारकुंडा देह थरथरायला लागला. अंधारात चकाकणारा सुरा बघून त्याची घाबरगुंडी उडाली. ओरडावंसं वाटत होतं पण तोंडातून अवाज निघेना. सावंत असावा तो. झिंगलेल्या अवस्थेत आणि काळोखातही त्याने ओळखलं. त्रिंबककर मागच्यामागे  पळत सुटला. सावंतने कुणाला मारलं? सावंतचे उद्योग गावाला नवीन नव्हते. येताजाता शिवीगाळ, धमक्या, मारहाण असं कानावर यायचं त्याच्याबद्दल. तोच असणार.  पण किंचाळलं कोण ते त्रिंबककरला कळलं नव्हतं.  त्याला त्याची पर्वाही नव्हती. कसंही करुन त्याला स्वत:ला वाचवायचं होतं. सावंतने गाठलं तर? तो जीव खाऊन पळायला लागला. अचानक त्याचा तोल गेला. कुणीतरी ढकललं होतं त्याला . सावंत? पण मागे वळून बघण्याआधीच त्याची  दारुने पोखरलेली कुडी जमिनीवर आपटली. चेहरा दगडावरच आपटला नेमका. कपाळातून रक्ताचे ओघळ वाहायला लागले.  ओघळणार्‍या रक्ताचा स्पर्श जाणवायला लागला तसा त्रिबंककर घाबरला. आपण मेलो याची त्याला खात्रीच पटली. कुणाचातरी आवाज कानापाशी जाणवत होता. उत्तर देण्यासाठी तो  तोंड उघडू पाहत होता पण त्याच्या हालचाली मंदावल्या. हळूहळू सारं शांत झालं.

त्रिंबककरने डोळे उघडले तेव्हा घरात विचित्र शांतता होती.  आपण जिवंत आहोत हे त्याला जाणवलं तसा तो एकदम उठायला गेला. पिरताने त्याच्या खांद्यावर तिचा दणकट हात ठेवला. त्रिंबककरने तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. बाजूला राजेश आणि धर्मेन्द्र. त्याला कळेना सगळी त्याच्याभोवती का जमा झाली आहेत. अंग ठेचकाळल्यासारखं दुखत होतं पण निकराने तो उठून बसला. तेवढ्यात राजेश आणि धर्मेन्द्र त्याच्यासमोर येऊन बसले.
"काल रातच्याला तू त्या सावंताला पायलंस का?" त्रिंबककरला काही आठवत नव्हतं. कपाळाला बांधलेल्या पांढर्‍या फडक्यावरुन त्याने हात फिरवला.
"लई दुखतंया. काय जालंय?"
"बेशुद्ध होऊन पडला व्हतास ."
"रात्र झाली तरी आला नाहीस म्हणून शोधत होतो. तेव्हा सापडलात. त्या खवळेच्या घराच्या बाजूला पडला होता. तसंच दवाखान्यात नेलं." राजेशने व्यवस्थित काय झालं ते सांगितलं.
"बाबा, तू त्या सावंताला पायलं का? पटकन सांग." धर्मेन्द्र घायकुतीला आला.
"बाबा, पटकन सांगा." राजेशचा आवाज ऐकून मात्र त्रिंबककर सुतासारखा सरळ झाला.
"हा, म्हनजी त्यो सावंतच व्हता असं वाटतंया."
"पन जालं काय? पलत व्हतास म्हनं." धर्मेन्द्र फिस्सकन हसला तसा त्रिंबककरला राग आला.
"मग काय मराया पायजे व्हतं की काय? त्यो मानूस हाय का मेला? सावंताचं काम ना हे? साला, त्येचं रगत तसलंच हाये. सगल्यांच्या जमिनी गिलनार. लई तरास हाय या मानसाचा. आता खूनखराबा बी सुरु केल्यान की काय?"
"खूनखराबा सोड. त्यो तुजं सपान पुरं करनार हाय." धर्मेन्द्रच्या आवाजातला उत्साह पाहून तो खोटं बोलत नाही याची खात्री पटली होती त्रिंबककरला.
"सपान? माजं? त्येला कसं माहित माजं सपान? आनी त्यो कसापायी पुरं करनार त्ये?" त्रिंबककरला काय चाललंय तेच कळत नव्हतं.
"तुजं त्वांड गप करायला तुजं सपान पुरं करत्यो म्हनाय लागलाय." धर्मेन्द्रच्या आवाजात उतावीळपणा होता.
"बाबा, तुमचं स्वप्न अख्ख्या गावाला ठाऊक आहे. येता जाता सांगता तुम्ही प्रत्येकाला." राजेश हसत म्हणाला. त्रिंबककर लाजलाच.
"पन..." राजेश आणि धर्मेन्द्र त्रिंबककरशी बोलत असतानाच सावंत आला. नुसताच बसून राहिला. उत्सुकतेने तिथे थांबलेले दोघं उठले शेवटी. पिरता चहाचं निमित्त करुन उठली. आता सावंतने तोंड उघडलं.
"पॉईटवर येतो मी डायरेक्ट. मी काय पवाराला दगाफटका केलेला नाही. धडा शिकवला. पायावर निभावलं. ऐकंना किती समजावून सांगितलं तरी. किती दिवस सांगतोय जमिन विक पण नाय. चांगला रेट देतोय. तरी बापजाद्याची जमीन नाही द्यायची म्हणून हटून बसलाय. आता बरा आहे. पण महिना जाईल चालायला लागेस्तो. तुला पाहिलं मी लेका. पळालास कशाला?" थोडावेळ त्रिंबककर काहीच बोलला नाही. वाट बघून सावंतने पुन्हा तोच प्रश्न विचारला.
"घाबरलो." चाचरत त्रिंबककर म्हणाला.
"मीच आलो मागून तुझ्या. पवारासारखा धडा तुला पण शिकायचा आहे का?" हळूहळू सावतंच्या आवाजात मग्रुरी डोकावायला लागली. पिरता कधी एकदा चहा घेऊन येईल असं झालं त्रिंबककरला.
"नशीब डोक्यावर निभावलं." त्रिंबककरला आता सारं स्पष्ट आठवलं. सावंतनेच ढकललं होतं तर. काही न बोलता दात दाखवत ओशाळं हसत तो सावंतकडे बघत राहिला.
"तर तो पवार जमिन देईलच आता. पण आखडू बेणं आहे. जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत काय चान्स नाही घेणार मी.  तुझं स्वप्न पुरं करणार आहे मी."
"का?" पटकन त्रिंबककरच्या तोंडून गेलं.
"तोंड बंद ठेवायला. उद्या पंधरा हजार घेऊन जा. दुकान सुरु कर. गिरणीसाठी नंतर लागतील तसे देईन." तो पुढे काही बोलणार तेवढ्यात पिरता चहा घेऊन आली.
"तुजा पैका नको आमाला सावंता. या भानगडीत नाय पडनार आमी."
"वैनी, मोठी रक्कम आहे. पवार जाणार नाही पोलिसात याची खात्री आहे मला. तसा मला कसलाच धोका नाही तरी देतोय मी. विचार करा. त्रिंबककर संध्याकाळपर्यंत काय ते सांग. पैसा मिळाला की तोंड गप ठेवायचं." सावंत निघून गेला.

राजेश, धर्मेन्द्र परत आत येऊन बसले.
"पवारच्या जखमा गंभीर नाहीत. पण तुम्ही एकमेव साक्षीदार आहात. वेळ आलीच तर तोंड बंद ठेवण्यासाठीचा आकडा आहे हा." त्रिंबककरने चमकून राजेशकडे पाहिलं.
"तू पैका वाढवून माग. सावंत न्हाई म्हनायचा नाही. चान्स हाय हा चांगला बाबा.  सिरीमंत व्हता यिल आपल्याला. पंधरा हजारात दुकान नाय व्हनार" धर्मेन्द्र कुजबूजत बराचवेळ सांगत राहिला त्रिंबककरला. दोघांचं बोलणं राजेश शांतपणे ऐकत होता. त्यांचं बोलणं संपल्यावर त्रिंबककरने राजेशकडे पाहिलं.
"बाबा, असलं काही करायचं नाही." राजेशच्या आवाजात ठामपणा होता.
"घ्या वो बाबा तुमी. इतका पैका नायतर आपल्याला कोन देनार. काय करसील रं बाबानं पैका घेतला तर? " धर्मेन्द्रने गुरकावत राजेशला विचारलं.
"तू भरीला घालू नको बाबांना. आणि तसं केलंत बाबा तर तुमचा माझा संबंध संपला." त्रिंबककर राजेशकडे पाहत राहिला.
"आरं, आसं नको बोलू रं. इतका पैका हाडाची काडं केली तरी नाय गावायचा. लक्स्मी आली हाये दारात तर...."
"खोटं बोलायला इतका पैसा? जमिनीचे वाद आहेत त्या दोघांचे. पवारला कळलं की तो तुमचा जीव घेईल.  आणि दारु पिऊन कुठे बरळलात तर सावंत सोडणार नाही. एकदा अडकलात की पाय खोल रुतत जाईल. स्वप्न पुरं होणार नाहीच.  तुरुंगाची हवा खायला मिळेल. ते दोघं बाहेर आरामात वर तोंड करुन फिरत राहतील."
"पुडचं पुडं. आता ह्यो पैका दुकान सुरु कराय उपयोगी व्हईल. मी घेनारच हाय. इतका पैका मी कदी पायला नवता. आनि मिलायचा बी न्हाई." त्रिंबककर हटून बसला. धर्मेन्द्रचा त्याला पाठिंबा मिळत होता. शब्दाला शब्द वाढत गेला. कुणीच माघार घेईना. पिरता राजेशच्या बाजूने कचाकचा भांडत राहिली.  धर्मेन्द्र आणि त्रिंबककर एक झालेले. सगळे हमरातुमरीवर आले. रागाच्या भरात धर्मेन्द्रने राजेशला ढकललं. राजेशनेही तितक्याच जोरात त्याला ढकलंल. पिरताने पुढे होत दोघांनाही ढकलून दिलं. स्वत:ला सावरत राजेशने निर्वाणीचा इशारा दिला.
"बाबा, पुन्हा सांगतोय. मी निघून जाईन घरातून." राजेश जोरात ओरडला.
"जा." त्रिंबककर थरथरत म्हणाला. धर्मेन्द्रने राजेशला दाराबाहेर ढकललंच. राजेशच्या डोळ्यात आग पेटली. रक्त साकळल्या नजरेने तो  त्रिंबककरकडे पाहत राहिला. त्याला अडवू पाहणार्‍या पिरताला बाजूला करत राजेश घरातून बाहेर पडला. त्याच्यामागून पिरता धावली. धर्मेन्द्र आणि त्रिंबककरही  त्या दोघांच्या मागे धावले.

"कुटं जानार हायस? उगा आपलं मी निगून जाईन, निगून जाईन. कुटं जायाचं न्हाय..." त्रिंबककर त्याच्या पाठीमागून जात ओरडला. पण राजेश थांबला नाही. त्याची तरुण पावलं गावातल्या वाड्या ओलांडत राहिली. त्याच्या मागे धावून धाप लागलेला त्रिंबककर अखेर एका ठिकाणी थांबला. धर्मेन्द्र त्रिंबककरच्या बाजूला उभा होता. पिरता दोघांकडे बघत तिथेच उभी राहिली. दोघांच्या नावाने तिने तिथेच बोटं मोडायला सुरुवात केली. त्रिंबककर मात्र विचारात गढून गेला. राजेश गेलेल्या दिशेने पाहत. राजेश कुठे  जाईल? पिरता पण त्याच्यामागून गेली तर? ती जाणारच लेकाबरोबर. राजेशची शाळा?  येतील परत? कितीतरी वेळ तो तसाच उभा राहिला. मग त्याने ठरवलं,  नाही आले तर बोलवून आणू. तसंही दुकान आणि गिरण आयुष्य बदलून टाकेल. त्याच्या बदललेल्या राहणीमानाची खात्री पटली की येतील दोघं परत. तोपर्यंत धर्मेन्द्र असेल बरोबर. पण आता सावंतकडे जायचं. सावंतकडे गेलं नाही तर हातातोंडाशी आलेला घास जाईल. पिरताकडे  त्याने कटाक्ष टाकला, मागे राहिलेल्या घराच्या दिशेने त्याने नजर टाकली आणि राजेश गेला त्या फाट्याकडे बघत निश्चल नजरने तो बराचवेळ उभा राहिला.  अखेर निर्णयाचा खुंटा बळकट केल्यासारखी त्याने स्वत:ची पावलं सावंतच्या घराकडे वळवली. धर्मेन्द्रच्या चेहर्‍यावर आनंदाचं चांदणं पसरलं. लगबगीने त्रिंबककरच्या बाजूने तो चालायला लागला. दोघांच्या पाठमोर्‍या आकृत्यांकडे पिरता ताटकळल्यासारखी बघत राहिली आणि राजेश गेलेल्या पायवाटेवर तिने आपलं पाऊल टाकलं.






Wednesday, January 10, 2018

कांताबाईची करामत

ईशान आजारी पडला आणि कांताबाईचा जीव कासावीस झाला. तिने त्याच्याकडे जायचं निश्चित केलं आणि ईशानला आधीच लागणारी धाप आणखीनच वाढली.
"आई, हट्टीपणा करु नको. मी आता बरा आहे. तू एकटी कशी येणार?"
"मेल्या, इतं माजा जीव टांगनीला लागला आनि येऊ नगं म्हनतंस. लाजबिज हाय की नाय तुला. निगाले मी."
"निघाले काय? ते काय पुण्याची एस टी पकडून वडगाव बुद्रुक गाठायचं आहे का? काहीही." आजारपणामुळे ईशानच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.  आता आई फोन ठेवणार नाही या कल्पनेनेच त्याच्या डोळ्यासमोर काळोख पसरला.
"करतो तुझ्या येण्याची व्यवस्था." आईचं बोलणं थांबवत त्याने फोन ठेवला तर बायको महिषासुरमर्दिनीसारखी समोर उभी. त्याने गपकन डोळे मिटले. या क्षणी  तोफेला तोंड द्यायची अजिबात इच्छा नव्हती त्याला. ईशानची आई अर्धशिक्षित पण कर्तुत्ववान, बायको तापट, मुलगा तारुण्यात पदार्पण केलेला आणि मुलगी अर्ध्या चड्डीत (त्याच्या आईच्या मते) वावरणारी. आई आली की काय गोंधळ उडेल ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आलं. ईशानला त्याचे डोळे कायमचेच मिटल्यासारखे वाटले.

कुणाच्यातरी सोबतीने कांताबाईने सातासमुद्रापलीकडे झेप घेतली. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या छोट्याशा गावात तिने पाऊल टाकलं  आणि हुरळलीच ती.
"आता काय मी परत न्हाई जात. हे आपल्या बुद्रुकवानीच हाय की. अंमल क्लीन हाये इतकंच. आनि पीपल कमी हायेत." वडगाव बुद्रुकला राहून जितकं इंग्रजी कानावर पडत होतं ते अमेरिकेत वापरायचंच असा कांताबाईचा पक्का निर्धार होता. ईशानला तिचं इंग्रजी बोलणं जाणवलं पण त्याच्या कानावर तप्त गोळा पडला तो तिच्या ’परत न्हाई जात’ ह्या वाक्याने. शानी, खरं तर तिचं नाव सानिका होतं पण ईशानची बायको झाल्यावर ती शानी झाली.  तर, शानीचा चेहरा संतापाने लालेलाल झाला. ऐश्वर्याला, ईशानच्या लेकीला आता ’फुल्ल’ कपड्यात वावरायला लागणार म्हणून दडपण आलं.  ईशानचा मुलगा मात्र नेहमीप्रमाणे खूश होता कारण तो स्वत:तच इतका गर्क होता की येऊ घातलेल्या संकटाची त्याला कल्पनाच नव्हती. कांताबाई धडाडीची. मनात आलं की धडकलीच ते करायला. त्यामुळेच तिच्या ’परत न्हाई जात’ या शब्दांनी ईशानचं धाबं दणाणलं.
"आई, गावातल्या शेताचं काय?" त्याने गुळमुळीत आवाजात विचारलं.
"त्येची चिंता तुला कस्यापाई?"  ईशानच्या सोफ्यावर मांडी घालून कांताबाईने तंबाखू खाण्यासाठी चंची उघडली.  शानीच्या नेत्रकटाक्षाकडे ईशानने दुर्लक्ष केलं.
"जीव ल्हान नगं करु. मी आलीच हाये तर जरा हितं बगून घेती कसी करत्यात श्येती ते. उपेग व्हईल त्येचा. आय बिजनेस वुमन्स." कांताबाईचं उसाचं शेत तर होतंच बरोबर भाज्या पिकवत होती ती मळ्यात, झालंच तर रोपं विकायची फुलझाडांची. अफाट ज्ञान होतं तिचं या विषयाचं."
"राहा गं तुला किती राहायचं ते." ईशान भावुक झाला. ईशानचे बाबा गेल्यावर कांताबाईनेच त्याला वाढवलं. ती म्हणते तशी खरंच ती ’बिझनेस वूमन’ होती. अभिमानाने ईशानचा ऊर भरुन आला. 

दुसर्‍या दिवशी सकाळी कांताबाई बाहेर पडली. गावासारखंच. भल्या पहाटे उठायचं आणि फिरायला बाहेर पडायचं. ईशानने निक्षून एकटं कुठे जायचं नाही सांगितलं होतं पण पहाटे पाच वाजता ढोरागत झोपलेली सगळी. तिने गुपचूप दार उघडलं. कुठे जायचं ते ठाऊक नव्हतं. पण जसं जाऊ तसं परत येऊ इतकी खूणगाठ मनाशी बांधत ती फिरत राहिली. प्रत्येकाच्या घरासमोरच्या बागेतल्या फुलझाडांच्या ती प्रेमातच पडत होती. मग हळूहळू तिला माणसंही दिसायला लागली. एकजात सगळी तांदळाच्या पिठासारखी पांढरी धोप. त्यांच्या रंगाचं तिला कौतुक वाटतंय तोपर्यंत रंग बदलला. काळी, पांढरी, तपकिरी... किती रंग ते माणसांचे. तिला अमेरिका एकदम फुलपाखरासारखी वाटायला लागली. तासभर छान गेला कांताबाईचा.

 कांताबाई घरी परत आली तरी घरातली अजून झोपलेलीच.
"च्या करती रं. उट. उसीरापावेतो स्लीप बरी नाय बाबांनो. उटा" ती जोरात म्हणाली. निदान शानी तरी उठेल म्हणून तिने थोडावेळ वाट पाहिली. पण सारं शांत होतं. चहा ठेवायला भांडं काढलं आणि ती अचंबित झाली.
"काय बाय तरी हे आक्रित. तिगासाठी च्या इतक्या मोट्या टोपात करायचा."  जाडजूड पातेल्याकडे ती कौतुकाने पाहत राहिली. ईशान आळस देत आला तशी तिने उत्साहाने चहा त्याच्यापुढे ठेवला.
"वाक करुन आली रं मी."
"वाक?" ईशानला आई काय म्हणतेय ते समजेना.
"अरं म्हंजी पिरायला जाऊन आले. वाकच म्हनत्यात ना तुज्या  विंग्रजीत?" ईशानच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.
"ऐकून ऐकून यायला लागलंय  विग्रंजी. गावाकडं विंग्रजीची फॅसनच आलीये. सगली विंग्रजी बोलत्यात. मला बी येतं वाइच. आलेच हाये इतं तर बोलून बगीन म्हन्ती. कसं?" कांताबाई उत्साहाने म्हणाली.
"कुणाशी बोलणार आहेस तू इंग्रजीत?" ईशानने दचकून विचारलं.
"लई रंगीबेरंगी लोकं दिसली आज वाकला गेले व्हते तवा. उद्या बोलनार हाय मी तेंच्यासी."
"रंगीबेरंगी?" एव्हाना शानी पण संभाषणात समाविष्ट झाली.
"लई येगयेगल्या रंगाची बाई मानसं दिसली. पांढरी धोप, काली, तपकिरी म्हनून रंगीबेरंगी. आनि आज झाडं आनूया आपन. तुज्या बागत काई म्हंजी काई नाय." ईशानने मान डोलवली, शानीने नाराजीने उडवली पण कांताबाईची मागणी पुरी झाली नाही. तीन - चार दिवस वाट पाहून झाडं आली नाहीत. कार्यतत्पर कांताबाईनेच कामाला लागायचं ठरवलं. तरातरा चालत ती कोपर्‍यावरच्या घरात गेली. तिथे गेले दोन दिवस ती रस्त्यावर ठेवलेली झाडं पाहत होती. त्यातलं  एक झाड तिने उचललं. तेवढ्यात आतून कुणीतरी धावत आलं.
"एक्स्युज मी." कांताबाई त्याच्या आवाजाने धास्तावली. हातातलं झाड घट्ट पकडून  ती तशीच उभी राहिली.
"पुट इट डाऊन. दॅटस माईन. आय अॲम प्लॅनिग टू प्लॅन्ट इट टुडे."
"वाइच विग्लिस बाबा, वाइच विग्लिस. यू विग्लिस...लांब आनि विमानावानी फास्ट." तिने त्या माणसाला समजवायचा प्रयत्न केला. त्याने तिच्या हातातलं झाड घेतलं आणि हाताने, तोंडाने  तो ते झाड त्याचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत राहिला.
"रस्ता ना, झाड ऑन रस्ता म्हनून ते माय, माय." हाताने आधी कांताबाईने रस्ता दाखवला. मग त्याच्या हातातलं झाड घेऊन ती म्हणाली
"दिस... मी कॉल झाड." तिने ते झाड रस्त्यावर ठेवलं. मग ती पुन्हा म्हणाली.
"रस्ता, झाड. झाड ऑन रस्ता" तोंडाने एकच गोष्ट आळवत, उजव्या हाताने स्वत:च्या छातीवर थोपटत ती झाड ऑन रस्ता म्हनून माय, माय करत राहिली. वडगाव बुद्रुक मध्ये ऐकलेलं इंग्रजी कांताबाई नाट्यपूर्ण आविष्कारांसकट पणाला लावत होती. बराचवेळ झाड या हातातून त्या हातात जात राहिलं. अखेर चायनीज माणूस झाड छातीशी कवटाळत रस्त्याच्या कडेवर बसलाच. कांताबाई पण त्याच्या बाजूला बसली. आता झाडावरुन तिचं लक्ष त्याच्या डोळ्याकडे गेलं.
"यू स्वेटर विनते?" स्वेटर विणण्याच्या खाणाखुणा त्याला समजेनात तसं तिने त्याला उभं केलं. त्याच्या अंगावरच्या जॅकेटला ती हात लावत राहिली. तो मागे झाला तसं तिने जॅकेटला हात लावणं थांबवलं.
"आय नो हर्ट. जॅकेट आऊट" स्वत:चं  जॅकेट काढत असल्याचे हावभाव कांताबाईने केले. त्याने मुकाट्याने आपल्या अंगावरचं  जॅकेट काढलं. मग कांताबाईने थंडीने कुडकुडण्याचा आविर्भाव केला आणि पुन्हा त्याला जॅकेट चढवलं.
"ओ, यू मीन जॅकेट" जॉनने कोडं सोडवल्यासारखी आनंदाने उडी मारली.
"नो, नो" तिने पुढे होत त्या जॅकेटवरची वुल हाताने कुरवाळली.
"स्वेटर" तो आनंदाने किंचाळला. जॉनबुवाला अमेरिकेत आल्यापासून इतकं पेचात कुणी पाडलं नव्हतं. कांताबाईचा प्रत्येक शब्द म्हणजे कोडं होतं आणि ते कोडं सोडविण्याचा आनंद विलक्षण होता.
 "येस, येस" कांताबाईही त्याच्याइतक्याच आनंदाने चित्कारली. स्वत:ला इंग्रजी येतं आणि ते समोरच्याला समजतं हा द्विगुणित झालेला आनंद कांताबाईच्या किंचाळीत होता. जॉन थोडासा दचकला पण तेवढ्यात तिने डोळे मिचकावत, बारीक करत त्याच्या डोळ्यांना हात लावला.
"ओ, आय गॉट इट नाऊ. यू आर टॉकींग अबाऊट नेपाली गाय. नॉट मी. यू मस्ट हॅव सीन देम ऑन इंडियाज साईडवॉक, सेलिंग स्वेटर्स." कांताबाई जॉनचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत होती. पण त्याचं इंग्रजी बुद्रुक शैलीतलं नव्हतं. तरीही समजल्यासारख्या माना हलवत जिवणी या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरवून ती प्रसन्नवदनाने त्याच्याकडे पाहत होती. पण गाय म्हटल्यावर तिला धक्का बसला.
"गाय? अमेरिका हाय बाबा ही. इतं गायी नाय उंडारत. यू चल बुद्रुक.  आय दाखव इंडियन गाय,  गायी, गायी... "  त्याच्या पाठीवर हात फिरवला तिने. ईशानशीच गप्पा मारतोय असं वाटत होतं कांताबाईला. जॉनपण खूश होता. दोघांनाही अर्थ कळत नसला तरी कानावर पडणार्‍या आवाजाचं अप्रूप होतं. इतक्या पहाटे कुणीतरी बोलायला सापडणं कठीणच होतं. त्यामुळे कोण काय बोलतंय समजलं नाही तरी एकमेकांच्या सोबतीने, आवाजाने दोघंही खूश होते.
"अमेरिका लई भारी. तुमच्याकडलं टोप बी मोटं आनि जड." कांताबाईने खाणाखुणा करत त्याला सांगितलं.
"यू लई बॉरी. लाईक माय मॉम." तो कौतुकाने तिच्याकडे पाहत होता. कांताबाईला चेव चढला. तिने झाडांबद्दल त्याला बरीच माहिती दिली. त्याला काही कळलं नाही तरी त्याने तिचा हात हातात घेतला. तिने पण त्याचा हात तिच्या हृदयावर ठेवला आणि तो तिथे आहे हे त्याला पटवलं.  घरी परत जाताना जॉनबाबाच्या हातात दोन झाडं आणि तिच्या हातात मावतील तितकी झाडं होती.

"अगं ही झाडं कुठून आणलीस?" ईशान तिच्याबरोबरचा माणूस पाहून चांगलाच घाबरला.
"आय अॲम जॉन. ऑल दिज प्लॅन्टस फॉर युवर मॉम."
" हा कोपर्‍यावरच्या घरात राहतो. त्येच्या घरासमोर रस्त्यावर पडलेली झाडं. मी उचलली..." पुढचं ईशानने ऐकलं नाही.
"आय अॲम व्हेरी सॉरी जॉन. शी डिडंट नो दॅट इट बिलॉग्ज टू यू."
"नो, नो दॅटस फाइन. इट इज अ गिफ्ट फ्रॉम मी टू यूवर मॉम." शानी सासूकडे पाहतच राहिली. इतकी वर्ष या देशात राहून तिला कुणी घरापर्यंत पोचवायला आलं नव्हतं. झाडाबिडाची तर गोष्टच सोडा.
"खूप महाग आहे हे झाड. १०० डॉलर्स तरी किंमत असेल एकेका झाडाची." ती ईशानच्या कानाशी पुटपुटली. शानीला आयुष्यात पहिल्यांदा सासू आपल्याकडे आल्याचा आनंद झाला.
"युवर मॉम इज सो स्वीट." स्वीट ऐकलं आणि कांताबाई  उत्साहाने उठली.
"शिरा, शिरा. मी शिरा. शिरा कुक." असं म्हणत जॉनच्या हाताला धरुन कांताबाईने त्याला घरात नेलं. ईशान, शानी मुकाट्याने त्या दोघांच्या मागे गेले. शानीने शिर्‍याचं सगळं साहित्य काढून दिलं. कांताबाईने एका बाजूला रवा भाजायला घेतला आणि जॉनला विचारलं.
"यू वडा?"
"वडा..." सगळेच गोंधळले.
"गोल, गोल...वडा गोल." शानीला पटकन कळलं.
"अहो, बटाटावडा म्हणतायत त्या." घरी आलेल्या पाहुण्याला शिरा आणि बटाटावडा खायला घालून कांताबाईने तृप्त केलं.  त्या दोन तासात शेजारी असूनही आतापर्यंत  जेवढ्या गप्पा झाल्या नसतील तेवढ्या ईशान, शानीने जॉनबरोबर आज पहिल्यांदा केल्या. कांताबाईला ’उद्या भेटू’ म्हणून घट्ट गळामिठी देत जॉन खूश होऊन परत गेला.

ईशानची मुलंही आजीचा करिश्मा पाहून खूश होती. ईशान - शानीच्या चेहर्‍यावर हास्य होतं. घरातलं वातावरण एकदम दिवाळीचं होऊन गेलं. दुपारी कांताबाईच्या हातच्या चविष्ट जेवणाची चव तोंडात रेंगाळत असतानाच दार वाजलं. ईशानने दार उघडलं.
"इज कांटाबाय होम?" स्वत:चं नाव ऐकल्यावर कांताबाईसकट सर्व बाहेर डोकावले.
"जॉन सेंट अस टू टेक हर अॲडव्हाईस अबाऊट प्लॅन्टस." दारासमोर गोळा झालेला घोळका आणि घोळक्याने कांताबाईला भेट म्हणून आणलेल्या झाडांकडे ईशानचं कुटुंब चकित होऊन पाहत राहिलं. कांताबाई पुढे झाली.
"ये ये...इन. आय बोलेन....माय नात - नातू हेल्प." आजीवर भाळलेली दोन्ही नातवंडं, तिच्या मराठीचं भाषांतर करणं जमणार नसलं तरी त्यात सामील झाली. सुहास्य मुद्रेने शानीने सारी झाडं स्वीकारली आणि अतिशय प्रेमाने सासुकडे पाहताना ’कांताबाईचा सल्ला’ नावाची ’कन्सल्टिंग फर्म’ उघडायचं स्वप्न तिच्या डोळ्यात तरळलं. 

Thursday, November 30, 2017

भूक

"ए, अंग चोरून बसायचं नाही. गुमान उभं राहा माझ्यासमोर...हा, असं. उतरव कपडे अंगावरचे. रडायचं, भेकायचं नाही. जीव नाही घेत तुझा. ड्रामाबाजी बंद एकदम. मी सांगेन ते चाळे करायचे आणि चालू पडायचं दुसर्‍या सैनिकाकडे. काय समजलं का? एऽऽऽऽऽऽ" गोर्‍या कातडीच्या त्या माणसाकडे ती भेदरून पाहत राहिली. तो माणूस काय म्हणतोय तेच तिला कळत नव्हतं. त्यात त्याच्या हातातली बंदूक पाहून तिला जोरजोरात ओरडावंसच वाटत होतं, पण तो सारखा काहीतरी बोलत होता आणि त्याच्या न समजणार्‍या खाणाखुणांनी ती ओरडायचं विसरून वेंधळ्यासारखी उभी होती.
त्यालाही भाषेची अडचण जाणवत होती. आता समजुतीने काही सांगायचं तर शांतपणे खाणाखुणा करून संवाद साधता येतो; पण बोलणं सुरू होण्याआधीच त्या पोरीचा घाबरलेला, गोंधळलेला चेहरा पाहून त्याच्या मस्तकात तिडीक गेली. त्याच्या भाषेत तो जोरजोरात हातवारे, आरडाओरडा, खाणाखुणा करायला लागला. तो संभोगासाठी भाषेची गरज नसतेच हे तिला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता. तिच्या डोळ्यातले भेदरलेले भाव त्याला उत्तेजित करत होते. उंदीर - मांजराच्या खेळाला एक प्रेक्षकही लाभला होता. त्याला मात्र त्याची कदर नव्हती. गाव सोडून तो सैन्यात आला तेव्हापासून शारीरिक उपासमार फारच वाढली होती. इतकी वर्ष बर्‍यांचदा गावी जायला तरी मिळत होतं; या वेळेस थेट युद्धालाच भिडायचं त्यांच्या देशाने ठरवलं तसं चित्र बदललं. सहा महिने झाले तरी युद्ध सुरू होण्याचं नाव नव्हतं. घाबरला होता त्याचा संरक्षणमंत्री. जगानेच विरोध करायला सुरुवात केल्यावर युद्धाची कळ दाबायला सारं सैन्य एकत्रित जमवूनही तो तयार नव्हता. दिवसा अंगाची लाही लाही होईल एवढं तापमान चढणार्‍या आणि रात्री गारठून अंग ताठ पडेल अशा या प्रदेशात प्रश्न होता तो किती महिने काढावे लागणार याचाच. पण ते निश्चित नव्हतं. युद्ध खरंच सुरू झालं तर या सैनिकी पोषाखातल्या देहाचं काय होणार ते काळच ठरवणार होता. त्यामुळे आता ताळतंत्र सोडून वागायचंच हा त्याचा निर्धार होता.
’मजा मारायचा साला. कोणाला पर्वा आहे आपली नाही तरी आपली. मेलो तर एक दिवस फोटो झळकेल सगळीकडे. आता उदो उदो करता आहेत सैनिकांच्या नावाने, मिडियावाल्यांनी तर कहर केला आहे. कुणाच्या तरी घरातल्यांना गाठतात आणि व्ही. डी. ओ. भेट घडवतात त्या घरातल्या सैनिकाशी. अरे, आणखी जीव तळमळतो घरच्या आठवणींनी. दोन मिनिटं बघायचं आणि आय लव्ह यू चा धोशा लावायचा. सध्या भाव आहे, मेलो तर वर्षातून एकदा करतीलच तो मेमोरिअल डे साजरा आमच्या नावाने की झालं. एक बायको आणि पोरं चार दिवस अश्रू ढाळतील तेवढे...’ जागृत होणार्‍या भावना टाळत त्याने समोरच्या काळ्याभोर शिल्पाकडे पाहिलं. त्या पोरीबरोबर मजा मारायला बाकीच्या सैनिकांनी त्याला समजून एकांत दिला होता. खूप दिवसांची खुमखुमी काढणार होता तो.  कोपर्‍यात उभ्या असलेल्या  दुसर्‍या मुलीचं अस्तित्वं त्याला जाणवलं नसतं तर तो पुरुष कसला. मुद्दामच त्याने तिची दखल न घेतल्यासारखं केलं होतं. मिळालेल्या संधीचा त्याला सिनेमास्टाईलने उपयोग करायचा होता. तरीही त्याची आशाळभूत नजर कायलंचं शरीर भेदून आरपार शिरत होती. त्याच्या नजरेला ठळकपणे पडण्याआधी शरीर जेवढं आक्रसता येईल तेवढं आक्रसून घेत तिने थिजल्या नजरेने पाय मुडपून स्वत:ला अधिकच कोपर्‍यात रेटलं. आपलं अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न ती होता होईल तेवढा करत राहिली.

गुरगुरत्या पुरुषी आवाजाने कायलचा थरकाप उडाला. पायात मणामणाच्या बेड्या अडकल्यागत तिने आपला देह त्याच्यासमोर रेटला. आपल्याच वर्गातल्या शेवंताचा उघडानागडा देह पाहताना तिने शरमेने मान खाली घातली होती, पण आता तिच्याच बाजूला उभं राहिल्यावर आपली अवस्था काय होणार हे तिच्या लक्षात आलं होतं. तरीही प्रतिकार करायची ऊर्मी तिला आवरता आली नाही. तिने शेवंताशी चाळा करणार्‍या त्याच्या हाताला जोरदार चिमटा घेतला. भडकलाच तो.
"थांब तुला पण मजा चाखवतोच." दातओठ खात त्याने तिचा शाळेचा पोषाख टराटरा फाडला. कायलने हाताने शरीर झाकायचा तोकडा प्रयत्न केला. आता दोन जीवांची मेजवानी त्याच्यासमोर होती. कशाची पर्वा करायची गरज नव्हती. दोघींचा आक्रोश, सैनिकी पोशाख, त्याच्या वाटेकडे डोळे लागलेली त्याची बायको, मुलं सगळं धूसर झालं होतं. उरला होता तो पशू. पशूसुद्धा बरा म्हणायची वेळ आणणारं वर्तन तो करणार होता आज. पहिल्यांदाच दाखवत असलेलं हे पुरुषीपण जरा जास्तच होतं आहे हे त्याला पटत होतं. तो इतका वाईट नाही असं त्याचं त्यालाच आतून आतून कुणीतरी सांगत होतं; पण वासनेने त्याच्या मनाचा तोल ढळलाच.

’युद्ध संपेल म्हणून गेले सहा महिने शरीर खितपत पडलंय एका एका सैनिकाचं, जागं होणारच ते. माणसाचंच लक्षण म्हणायचं असतं त्याला. पण ह्या पोरींनी जरा जाणीव दाखवली असती तर ही वेळ कशाला येईल? समजुतीचा मामला असला की बरं पडतं. प्रेतासारख्या थंड उभ्या आहेत दोघी.’ एकदम त्याचा पारा चढला.
"एऽऽऽ मी नाही तुम्हाला इथे बोलावलेलं. मेजरनेच सांगितलं आम्हाला की पैसा फेकला की तुमचा समाज पोरी पुरवतो म्हणून. त्यानेच केली ही व्यवस्था आणि तुम्ही काय चालवलाय हा तमाशा? बास झालं आता रडणंभेकणं. नीट वागलात तर मी सुद्धा प्रेमाने वागेन, नाहीतर माझा सैनिकी खाक्या दिसेलच ." दोघींच्या अंगावर धावलाच तो. त्यांना मारत, आडवंतिडवं तुडवीत आळीपाळीनं त्याने त्या दोघींना उपभोगलं. सुख ओरबाडलं.
पन्नास हजार सैनिकांचा तो फक्त एक प्रतिनिधी होता. गेले सहा महिने नुसतीच प्रतीक्षा चालली होती. सुरुवातीचे दिवस बरे गेले म्हणा. वातावरणातला बदल, वेगळं अन्न, सगळ्याची बदललेली चव बरी वाटत होती; पण काही दिवसांतच नावीन्य संपलं. रटाळ कंटाळलेपण भरून राहिला सर्वत्र. आता युद्ध सुरू होण्याची वाट पाहण्याव्यतिरिक्त काहीच उद्योग उरला नाही. त्यांचा देश पुढारलेला. इ मेल, व्हिडिओ टेप अशा अत्यानुधिक सोयींनी घरच्यांशी संपर्क होताच. पण ह्याच गोष्टी मनाचा ताबा ढासळवून टाकणार्‍या ठरत होत्या हे कोण सांगणार त्याच्या देशातल्या प्रसारमाध्यमांना. ती तर चेकाळल्यासारखी देशभक्तीच्या भावनेने सैनिकांचं मनोबळ वाढवायच्या प्रयत्नात होती. आधीच भौतिक सुखाला सरावलेल्या सैनिकांना या वातावरणात रुळणं कठीण पडत होतं. प्रशिक्षण वेगळं आणि प्रत्यक्ष रणभूमी निराळी. खाण्यापिण्याच्या वेगळ्या सवयी,  आजारपणं, वैफल्य याच्याच जोडीला विषयवासनेने उद्दीपित झालेल्या सैनिकांना आवरण्यासाठी शेवटी मेजरला अतिशय धाडसी पाऊल उचलावं लागलं.

हवेत मातीचा धुरळा उडवीत चार जीप गावात शिरल्या तशी तिथली शांतता ढवळून निघाली. भटकणारी काही पोरं गाड्यांच्या मागे धावत सुटली. शहरातला साहेब आला तरच दिसणारी गाडी वाड्यातल्या लोकांचं आकर्षण, विरंगुळ्याचं साधन होतं.  चारदोन पोरं, भुंकणारी एक दोन कुत्री याव्यतिरिक्त कंटाळवाणी स्वस्थता नांदत होती. वातावरणात कसलीच हालचाल नसलेलं ते गाव सुस्तावल्यासारखं भासत होतं. वाडीतल्या गर्द लाल विटांच्या झाडीत वसलेल्या घरांसमोरही तसाच आळसावलेला कंटाळा जाणवत होता. दुपारची निवांत वेळ. कामधाम आटपून मिश्री लावत बायकांचा आराम चालला होता. ही वेळ त्या सगळ्यांच्याच आवडीची. पुरुष शेतावर नाही तर रोजंदारीत गुंतलेले, पोरीबाळी टेकडीवरच्या शाळेत अडकलेल्या. जेवणखाणं आटोपलं की गप्पा मारता मारता गोधड्या शिवत बसणं हा नेहमीचा उद्योग. नीनाने ह्या गोधड्या शहरात नेऊन विकल्या की थोडेफार पैसेही मिळत. जेमतेम चार महिनेच त्यांना मिळत. एकदा का बर्फ पडायला सुरुवात झाली की चार भिंतींच्या आता राहणं सक्तीचं. मग सगळं ठप्प. अगदी कोंडल्यागत. त्यामुळे जीवघेणा उकाडाच बरा वाटायचा. निदान एकत्र जमून गप्पा मारत मारत गोधड्या शिवण्याचं काम चालू राहतं. आता तर लोणची, मसालेसुद्धा एकत्र बसून एकाच ठिकाणी करायचे असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. गप्पा होतात आणि कामाचा थकवा जाणवत नाही.  मुलं पण शाळेत गेलेली. चार खणांची टेकडीवरची शाळा म्हणजे बायकांची संजीवनी होती. शहरातले इनमिन दोन शिक्षक चार पाच वर्ग चालवत होते. गावातल्याच एक दोघांच्या घरी तो शिक्षकवर्ग रहायचा. चार महिने शिकवायचं. बर्फ पडायला लागला की गावाचा संपर्क तुटायचा जगाशी. त्याच्या आधी शाळा बंद करून शिक्षक शहरात परतत. गावाकडून दोन्ही शिक्षकांना प्रेमाची वागणूक मिळे. त्यामागे पोरंबाळं लिखापढी करून शहराचा मार्ग धरतील. आपल्या नशिबी दोन वेळची रोटी तरी येईल ही भावना तर होतीच; पण पोरं शाळेत गेली की चार क्षण निवांत घालवायला मिळतात. सुखदु:ख उगाळता येतात यातलं समाधान अधिक होतं.
आजही गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. नीनाने नेहमीप्रमाणे काही तरी नवीन योजना त्यांच्यासमोर मांडली होती. तिचा उत्साह, हुशारी सगळ्या गावाला नेहमीच थक्क करून जायची. बुकं न शिकता ही एवढी हुशार कशी हे त्या वाडीच्या दृष्टीने कोडंच होतं. पण तिला कुणी विरोध केला नाही. झाला तर फायदाच झाला होता  सगळ्या वाड्यांना तिच्या नवीन नवीन योजनांचा. शाळासुद्धा तिच्याच पुढाकाराने चालू झाली. मुलांना शाळेत पाठवून काय करायचं असं विचारणार्‍या बायाबापड्यांना तिने पोरांच्या कचाट्यातून कशी सुटका होईल हीच लालूच दाखविली होती. नंतर मग सगळे फायदे आपोआपच लक्षात आले होते प्रत्येकाच्या. आत्ताही उत्साहाने ती काही तरी बोलत होती. तेवढ्यात तिच्या कानावर कसलासा आवाज आला. त्यानंतर जोरजोरात आरडाओरडा. क्षणभर हृदयाचे ठोके थांबल्यासारखं वाटलं नीनाला. एव्हाना बाकीच्यांच्या कानावरही आरडाओरडा पडला. ’साळा, साळा’ कुणीतरी आवाजाच्या दिशेचा वेध घ्यायचा प्रयत्न केला तशा जीवाच्या आकांताने सगळ्या जणी शाळेच्या दिशेने धावत सुटल्या.

चार खोल्यांच्या त्या शाळेच्या आवारात क्रूरतेने थैमान घातलं होतं. आरडाओरडा, रडारड, पळापळ आणि हातात बंदुका घेतलेली दोनचार अनोळखी माणसं एवढंच दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. बंद ट्रकमध्ये टिपलेल्या मुली बंदुकीच्या नळीने ढकलल्या जात होत्या. आक्रोश, आरडाओरडा, जीपच्या टायर्सनी उडविलेले धुळीचे लोट आसमंत लालसर करून टाकत होते. आपापल्या मुलींना शोधता शोधता प्रसंगावधान राखून जिची सुटका करता येईल तिला हाताला ओढून बाजूला काढत होत्या सगळ्या जणी. थरथर कापणार्‍या नीनाचे डोळे कायलला शोधत होते. दरम्यान दोन तीन बायकांना झाडाच्या मागे आडोशाला धाडलं तिने. बाजूला ओढून घेतलेल्या मुलींना ती तिकडेच ढकलत होती. त्या दोघी मग हळूच बंदूकधारी माणसांना चुकवून उतारावरून लपतछपत त्या मुलींना वाडीकडे जायला मदत करीत होत्या. पण किती? दोन चार मुलींनाच सोडवता आलं. बंदुकीच्या नळ्या त्या माणसांनी आता या बायकांच्या जमावावरही रोखल्या तशी त्यांना माघार घेणं भागच होतं. तेवढ्यात घामाने थबथबलेल्या कायलचे वर्गाच्या दाराच्या आडचे डोळे नीनाच्या दृष्टीला पडले तशी तिने कायलच्या दिशेने धाव घेतली. ती कायलपर्यंत पोचेपर्यंत अंगाखांद्यावर पडलेल्या दंडुक्याच्या माराची तिला पर्वा नव्हती; पण ती कायलपाशी पोचून तिचा हात धरणार तोच बंदुकीचा दस्ता तिच्या डोक्यावर एवढ्याने बसला की ती कोसळलीच. अवघे चाळीस सेकंद. खाली पडता पडता तिच्या कपाळावरची शीर तडतडली. हाच क्षण आहे कायलला वाचवायचा. एकदा हा पोटचा गोळा हातातून सुटला तर पुन्हा म्हणून भेटायचा नाही.
"कायलऽऽऽ, कायलऽऽऽ" उठण्याचा प्रयत्न करीत तिने हात पुढे करण्याचा प्रयत्न केला पण पूर्ण शाळाच तिच्याभोवती गरगरा फिरली. तिने पुन्हा एकदा स्वत:लाच बजावलं. या क्षणी तिला उभं राहणं भाग होतं. जबरदस्त इच्छाशक्तीने ती कशीबशी उठून बसती झाली. डोळे उघडून तिने  इकडे तिकडे पाहिलं. पण सगळीकडे शांतता पसरली होती. शांतता, भयाण शांतता! डोक्यातून भळभळा वाहणारं रक्त थोपवण्याचा प्रयत्न करत ती उठून बसली. आजूबाजूला सगळ्या बायका असूनही तिथे पसरली होती शांतता. काळीज चिरून जाणारा आक्रोश बरा असं म्हणावंसं वाटणारी शांतता. प्रत्येक जण हृदयात न मावणारा आकांत अश्रूंनी ढाळत बसला होता. मूकपणे. बाकी सारं कसं अगदी शांत शांत होतं. थोडा वेळ नीना काय घडलं त्याचा विचार करत तशीच बसून राहिली. पण आता काहीतरी करायला हवं याचं भान लगेच आलं तिला.
"चला, रडून न्हाई काम व्हनार. आदमी धुंडाळा कुटं हायेत. त्येंच्या कानावर घालू म्हनत व्हते मी."
नीनाने थरथरणारी बोटं दोघींच्या हातात गुंतवली. एकदोघींनी तिच्या गळ्यात पडून दु:खाला वाट मोकळी करून दिली. एकमेकीचा आधार घेत सार्‍याजणी उठल्या.
"माजी शेवंता, अगं नीना तू भैनीवानी ग आमाला. आनून दे माजी शेवंता. दे ना गं. दे..."
शेवंताची आई धाय मोकलून रडायला लागली तसा सगळ्याजणींनीच गळा काढला. नीनाची त्यांना शांत करण्यासाठी तारांबळ उडाली. शेवटी सगळ्या जणी फॅक्टरीच्या दिशेने निघाल्या.
"कुटं नेलं असेल नराधमांनी या पोरींना? कुटं सोधायचं?कसं आननार परत त्येंना?कोन व्हती ती मानसं?आनी बंदुका गावल्या कुटं?" प्रत्येक जण नीनालाच जाब विचारत होती. प्रत्येकीलाच आपल्या पुरुषाला काय जाब द्यायचं या चिंतेने घेरलं होतं.
"मले काय बी मायत नाय ग बये. बंदुका व्हत्या सगल्यांजवल. पोरी पलवल्या म्हंजी पोलिसांकडं जाया लागेल येवढंच माज्या द्यानी येतं बग. टकली नगं उटवू कुनी माजी. आनी पोलिसात जायाचं तर किती घंटं लागतील कोनाला ठाव." नीनाने बायकांचं बोलणं थोपवलं.
"बापय मानसाला धाडू, मिट्ट कालोक पडल वापीस यायचं मंजी."
"कसापायी या साळा सुरु केल्या मास्तरानं देव जानं. तुज्यामुलं जालं ह्ये रामायन" रुपा कावल्यागत पुटपुटली तसं नीनाने तिला थोपवलं.
"तू सबुद बोलायची कोसीस काय उगा करती व्हय? सालत सिकून पोरांनी आपल्याला बी आकल दिलीच की. या परसांगातून निबवायला पन त्येचाच उपेग व्हईल. पोरांकडून चार अकलंच्या गोस्टी सिकलो तेचा उपेग व्हनारच ना?"
नीनाचं म्हणणं पटल्यासारख्या सगळ्याजणींनी मान डोलावली आणि त्या छोट्याशा गावातल्या कारखान्यासमोर पोचण्यासाठी  धावपळ उडाली. आजूबाजूच्या वाड्यांतले सगळे पुरुष इथेच कामाला होते. दिवसपाळी रात्रपाळी आटोपली की दारूच्या अड्ड्यावर धिंगाणा घालणं हे सगळ्या वाड्यांतल्या पुरुषांचा आवडता उद्योग. पुरुषांनी कामावरून दारूच्या अधीन व्हायच्या तिथे पोचणं भाग होतं. दारवानाने पांडेवाडीतल्या बायका आल्याचं सांगितल्यावर पुरुष धावत बाहेर आले. सगळ्या बायका एकदम का आल्या असाव्यात हाच विचार त्यांच्या मनात घोळत होता.
रडत भेकत बोलणार्‍या बायकांना नीनाने आवरलं. काय झालं आहे ते तिने समजावून सांगितलं. बायकांना जबरदस्तीने परत पाठवून पुरुषांनी पोलिसचौकीच्या दिशेने धाव घेतली. फॅक्टरीभर ही बातमी वार्‍यासारखी पसरली. वाड्यावाड्यातले पुरुष मुलींचा शोध घ्यायला इकडे तिकडे पांगले.
पोलिसचौकीत तक्रार नोंदवून, शक्य तिथे शोधण्याचा प्रयत्न करून वाडीतल्या लोकांना यायला मध्यरात्र उलटली. कुणाला काही अंदाज करता येत नव्हता. पुन्हा हे असं काही तरी प्रथमच घडत होतं. त्या भागातल्या वाड्या वाड्यांमध्ये तसा सलोखा होता त्यामुळे वातावरण शांतच असायचं. काही कुरबूर असली तरी पंचायत होतीच. आत्तापर्यंत भरदिवसा शाळेवरच धाड घालून मुलींना पळवून नेल्याची ही पहिलीच घटना. गाव सुन्न झाला.

शाळेतल्या पंधरा मुली नाहीशा झाल्या होत्या. तरीही वाडीतली शाळा मात्र नीनाने बंद पडू दिली नव्हती. तिने वाडीतल्या बायकांची समजूत घातली. आळीपाळीने बायका, मुलं दंडुके, दगड घेऊन जवळपास लपून बसत होते शाळेच्या. पण तरीही शाळेमधली हजेरी कमी होत चालली होती. पुन्हा गेलेल्या मुलींचा शोध लागायचा होताच.  आता हे नित्याचं होत चाललं होतं. दर आठ दिवसांनी कुठल्या तरी वाडीवरची शाळा लुटली जायची. पुन्हा तोच आक्रोश, शोधाशोध आणि नंतर सगळीकडे रिक्त पोकळ मनं. शहरातली गुंडगिरी गावाच्या उंबरठ्यापाशी पोचली होती.
रात्र रात्र विचार करून नीनाची रया गेली. कायलच्या बापाने तर पोरीचं नावच टाकलं. आता ती परत आली काय किंवा नाही त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच. तिच्या नावाने आंघोळ करुनही तो मोकळा झाला.
"नीना, तू बी सोडून दे पोरीचा इचार. एक बी पोर परत गावली नाय गावाला. सहा मयनं व्हतील. पोरी फकस्त चालल्या आहेत गावातून." सदाने नीनाला समजावण्याचा प्रयत्न केला तशी ती चवताळलीच.
"भाड्या लाज नाई का तुला?तुजी पोरगी कसातून जातीया तितं ते बग माज्या राजा."
तो गप्प झाला. आपली बायडी येताजाता उखडलेली का असते हे बिचार्‍याला कधी उलगडलंच नव्हतं. शेजारच्या वाडीतली ही मुलगी लहानपणापासून अशीच. सगळ्या वाड्यात तोंडाळ म्हणूनच ओळखली जायची. येता जाता तिच्या दादल्याचं काय होणार लग्न झाल्यावर ही चिंता व्यक्त करायचा प्रत्येकजण. पण एकीकडे सगळ्यांना तिचं कौतुक पण होतं. बंडखोर, उद्योगी नीना कुठल्याही बाबतीत पुढाकार घ्यायला तयार असायची. तो तिच्या याच गुणावर भाळला होता. मामाच्या मागे लागून या मुलीशी त्याने पंचवीस वर्षापूर्वी सोयरीक जमविली तेव्हा वाड्यातल्या प्रत्येकाने त्याला तो निखारा पदरात बांधतो आहे असं म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण पुरुषांना काय पदर असतो निखारा बांधून घ्यायला असा विनोद करीत तो ठाम राहिला होता. पुढेमागे होईल शांत असं स्वत:लाच समजावत तो तिच्या स्वभावातल्या तिखटपणाचं मनातून कौतुकच करत असे. पण नीना तशीच राहिली. हळूहळू वाडीनेही तिचा स्वभाव स्वीकारला. कुठल्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडायचं तर वाडीसाठी नीना नक्कीच तिथे असणार हे प्रत्येकाला माहीत होतं, अपेक्षित होतं. आताही तिचं बोलणं त्याला झोंबलं तरी नवीन नव्हतं. नीनाचे विचार, कृती सगळ्यात कुठेतरी बंडखोरपणा असतो हे त्याला परत नव्याने जाणवलं. तो थोडा वेळ शांतपणे पडून राहिला. ती त्याच्याकडे नजर लावून बसली.
"नाही, सगलं थांबवनार हाय मी. ती पोर काई खुसीनं गेली? मी रान उटवनार, सगल्यांना जागं केल्याबिगर र्‍हानार नाय. पोरीचा सोद असा गुमान बसून न्हाई लागायचा."
"कर काय करनार ते. माज्या मागं लागू नको म्हंजी जालं. ती माजी बी पोर हाय नी मला बी कालीज हाय येवडं द्यानात ठीव बरीक."
’मग कालजावर दगुड ठीवल्यागत कसापायी वागनं तुजं?’ मनातला प्रश्न ओठावर येऊ न देता तिने विषय संपवला.
"सा मयनं जालं. कुनी बी गावात येतं. बंदूक दावतं आनं घेऊन जातं आपल्या पोरींना. आपण सोदंत रातो. पोलिस येतात निवांत. त्येच्या नंतर काय? सालंत बी जायला तयार न्हाई कुनी आता. आपनंच सोदून काडायला हवं ही मानसं कोन हायेत ते. उगी राहून न्हाई चालायचं."

नीनाने वाडीतल्या पारापारावर भाषणं द्यायला सुरुवात केली. कधी गावच्या गाव लोटायचा तर कधी पडेल चेहर्‍याने ती घरी परतायची. शेवटच्या वाडीपर्यंत पोचेपर्यंत तिने चार पाच तासांची पायपीट केलेली असायची. हळूहळू नीनाबरोबर काम करणारे हात वाढले. कुठल्याकुठल्या वाडीतून येऊन लोक दु:ख मोकळं करायला लागले. आठवड्यातून एकदा वाडीतल्या पारावर बसून ती शोधकामाचा आढावा घ्यायला लागली.
आणि अचानक एक दिवस रामवाडीतल्या ठाकुराने तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. कॅमेरा घेतलेल्या माणसाला पाहून तिने आपला अचंबा पदरात लपवला. तिची धडपड, मुली हरवलेल्या लोकांचा आक्रोश सारं कॅमेर्‍यात बंदिस्त झालं.
गावातल्या तरुण पोरांनी तिचा कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेला फोटो दाखवायला गर्दी केली तेव्हा ती मात्र एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहिली.
"पुडं काय? काय व्हनार या फोटु आनि बातमीनं. परत येनार का पोरी? सोदनार का ते आपल्या पोरींस्नी? फोटु आला पेपरात म्हनून गुमान बसून नाइ चालनार.  काय तरी आनी कराया पायजे."

अचानक तिला धागा सापडला. तिची मुलाखत घ्यायला आलेल्या वार्ताहरानं तिला विचारलं होतं की ती पंतप्रधानांकडे गार्‍हाणं घेऊन जाणार का? त्या वेळेस तिला पंतप्रधान कुठे राहतात तेही माहीत नव्हतं. पण त्या प्रश्नाने तिला एकदम जाग आली. शाळेतल्या मुलांच्या मदतीने तिने शुद्ध भाषेत  गावाची फरफट पंतप्रधानांना कळवली. आता पुन्हा तिच्या आशा पालवल्या होत्या. राहून राहून तिला वाटत होतं, एवढा अख्खा देश या माणसाला पंतप्रधान करतो म्हणजे त्याच्या इशार्‍यावर नक्की कामं होत असणार.

ती दर पंधरा दिवसांनी येणार्‍या डाकेनं पंतप्रधानांच्या पत्राची वाट पाहत राहिली. दोन महिने झाल्यावर प्रयत्न निष्फळ ठरला या जाणिवेने निराश झाली. तिच्याबरोबर अथकपणे काम करणार्‍या वाड्यांमधल्या लोकांना तिची निराशा पाहवत नव्हती. कुणीतरी तिलाच पंतप्रधानांकडे भेटायला पाठवू अशी कल्पना व्यक्त केली आणि ती त्या कल्पनेने झपाटली.  पंतप्रधानांपर्यंत पोचायचंच हा निर्धार तिने वाडीवाडीतून व्यक्त केला. त्यांनीही तिला निराश केलं नाही. पै न पै जमवून तिला राजधानीत पाठवलं. सतत दोन दिवस ती पंतप्रधानांच्या निवासस्थानावर बसून राहिली. त्यांची भेट मिळाली नाही तर वर्तमानपत्र, दूरदर्शनवरून सतत मिळणार्‍या प्रसिद्धीने आपलं काम होणारच हे समजण्याइतपत खेड्यात वाढलेली नीना नक्कीच चलाख होती. पंतप्रधानांच्या भेटीशिवाय ती परत आली तरी देशाला नाहीतर मुली पळवून नेणार्‍यांना काहीतरी हालचाल करावीच लागेल याची तिला खात्री होती. तिला खात्री होती आणि गावाला तिच्याबद्दल प्रचंड विश्वास होता.

तिच्या अविरत प्रयत्नांना यश म्हणून की काय अचानक नीनाला भेटीसाठी शहरातून सांगावा आला. गावात चेतना जागृत झाली. वर्तमानपत्रातल्या प्रसिद्धीने गावाला आवाज मिळवून दिला.  नीनाने ताबडतोब होकार कळवला,  गाव तिला एकटीला पाठवायला तयार नव्हतं. पण पर्याय नव्हता. तिला एकटीलाच भेट मिळेल हे आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. पुन्हा वाडीवाडीत तिने सभा घेतल्या. गावाबाहेर वाटाघाटी करून योजना तयार झाली.

बघता बघता भेटीचा दिवस उजाडला. काळ्या रंगाची मोठी गाडी गावाच्या वेशीबाहेर उभी होती. अख्खा गाव तिला निरोप द्यायला उभा होता. बुरखा घातलेल्या चालकाने तिच्या पुढ्यात फडका टाकून डोळ्याला घट्ट बांधायला लावला. पट्टी बांधता बांधता तिने निसटता अश्रू सांभाळत तिने सदाकडे पाहिलं. त्याची मूक नजर तिच्या काळजावर चरा उमटवत गेली. ती कुठे चालली आहे, तिचं काय होणार, मुलींना ती आणू शकणार का, कशाचीही तिला अंधुकशीही कल्पना नव्हती. कायलसाठी, बाकीच्या मुलींसाठी ती परत आली नाही तरी हे काम चालू ठेवायला तिने सदाला बजावलं होतं. त्यानेही तिचा हात घट्ट दाबत मूक संमती दर्शवली होती. शांत कुणाच्या अध्यामध्यात नसणारा सदा तिचं काही बरं वाईट झालं तर तग धरू शकेल का याचीच तिला शंका होती. त्यामुळे मुलींचा शोध घेण्याचं काम नक्कीच त्याच्यासारख्या माणसाचं नव्हतं याची जाणीव असूनही त्याने मोडता तर घातला नाही या समाधानात ती गाडीत बसली. गाडीच्या काळ्या खिडक्यांपलीकडचं जग आता तिला दिसत नव्हतं. किती वेळ आपण गाडीत बसलो हेही तिला उमजलं नव्हतं. पण काही तास नक्कीच गेले होते. कोवळी उन्हं रणरणीत झाली होती. चालकाने गाडीतून उतरून तिला मूकपणे चलण्याची खूण केली.

छोट्याशा झोपडीवजा खोलीत ती शिरली. उन्हामुळे डोळ्यासमोर एकदम अंधार आला. त्यात बरेच तास बांधलेल्या पट्टीमुळे तिला नीट दिसायला काहीसा वेळच लागला. खोलीतलं दृश्यं पूर्ण दिसायला लागलं आणि सैन्यातल्या कपड्यांतील माणसांना पाहताच तिला सारा उलगडा क्षणात झाला.
"अक्की दुनिया तुमासंग पारथना करतं तर ह्यो धंदं तुमचं. इतकी जवल हाय हद आनि आमाला संसय बी नाय आला तुमा लोकांचा. देसापायी लडनारी भली मानसं म्हनतो आमी तुमाला आनि ह्ये असलं उद्येग तुमचे."
"शांत व्हा बाई. बसा इथे या खुर्चीवर."
तिच्यासाठी भाषांतर करणार्‍या वाडीतल्याच श्यामच्या अंगावर ती चवताळून धावली. तिथल्याच सैनिकाने तिला अडवलं. जबरदस्तीने त्या सैन्याच्या अधिकार्‍याच्या समोर बसवलं.
"माज्या पोरी कुटं हायती? आनी कसापायी तुमी गेवून आले त्येंना ते बी कललं पायजेल." तीव्र कटाक्ष फेकत तिने त्या अधिकार्‍याला विचारलं.
"बाई, आम्ही बोलावलं आहे तुम्हाला. मला पाहिजे तेवढीच माहिती देईन. तुम्ही आवाज कमी करुन बोललात तर चांगलं. शांततेने बोलणी पार पडावीत हीच अपेक्षा आहे माझी."
"तुज्या बाला सांग सांत व्हायाला. मला बी नाय चालत आसं बोललेलं. पर  येल आलीच तर बोलती मी या बासत." नीनाने त्याला प्रत्युत्तर केलं.
"आधीच आकाशपाताळ एक करुन तुम्ही आमची झोप उडवली आहे. मी आपली बोलणी शांततेने पार पडावीत या अपेक्षेने तुम्हाला बोलावलंय. तुम्हाला हे मान्य नसेल तर परत जाऊ शकता तुम्ही."  अधिकार्‍याचा रागरंग ओळखत नीनाने पडतं घ्यायचं ठरवलं. ती एकदम गप्प झाली.
"हो. आम्ही तुमच्या मुली वापरतो सैनिकांसाठी. आता लवकरच वर्ष होईल आम्हाला आमच्या देशातून आल्याला. युद्ध सुरु होण्याची चिन्ह नाहीत. युद्धाची वाट बघत किती दिवस भावना काबूत ठेवणार आमचे सैनिक? शरीरधर्म कुणाला चुकले आहेत?"
"हा ते काय पन असेल. आमच्या पोरी कसापायी वापरता तुमी? सेहरात पाटवा त्येंना. तितं मिलतात अस्या बायका." नीनाला त्या अधिकार्‍याच्या बोलण्याचा रोख कळत नव्हता. पण त्याने तिला एकदम थांबवलं.
"कशासाठी? आम्ही तुमच्या मुलींसाठी पैसे मोजतोच की. मलाच समजत नाही की सगळा मामला खुशीचा असताना पेपरवाल्यापासून पार तुमच्या पंतप्रधानापर्यंत पोचण्याचा आटापिटा का केलात तुम्ही? तुम्ही काय साध्य केलंत असं करून ह्याचं उत्तर हवं आहे मला. मुलींची किंमत कमी वाटत असेल तर सांगा. करू काही व्यवस्था."
"तू काय बोलून राह्यला? मला काय बी उमज पडत नाय. कुटल्या पैक्याची बासा करतो तू? आमाला काय पैका मिलाला नाय आन असला पैका नगंच. आनी कुनीबी खुसीनं नाय गेलं. बंदुकीला घाबरलं त्ये. पैका दिला म्हनं. आमी काय पैक्यासाटी पोरीबालींची सरीरं विकनारी मानसं नाय सायब. सगल्य पोरीस्नी गुमान आना हिथं."
काही क्षण गेले. सैन्यातल्या त्या अधिकार्‍याला नव्यानेच सगळा उलगडा झाल्यासारखा त्याचा चेहरा लालबुंद झाला. तो ताडकन उठला. बाजूला उभ्या असलेल्या माणसांच्या कानात पुटपुटला आणि ताडताड पावलं टाकत चालता झाला. क्षणभरात एक माणूस आठ दहा मुलींना घेऊन तिच्यासमोर येऊन उभा राहिला. सगळ्या गोर्‍या कातडीमध्ये तिच्याच रंगाचा तो माणूस पाहून नक्की काय चाललं आहे याची पुसटशी कल्पना तिला यायला लागली होती. ती खवळली.
"कोनाचा रं तू? तू पुरवतोस मुली या गोर्‍या राक्ससांना? पैका करतो तू आनी ते म्हनतात आमी खुसी खुसी देतो आमच्या पोरी त्येंना."
दातओठ खात तो तिच्याकडे बघत राहिला. तेवढ्यात तो अधिकारी परत आला.
"इथल्या कँपवरच्या मुली ताब्यात घ्या बाई. या प्रकाराची कल्पना नव्हती. पण लवकरात लवकर सगळ्या मुली तुम्हाला परत मिळतील याची खात्री मी देतो तुम्हाला."
नीनाला तो माणूस साक्षात देवमाणसासारखा वाटला. लवकरच सगळ्या मुली गावात परत येतील या भावनेने तिचे डोळे ओलावले.
"सायबा, इस्वास टेवायचा का नाय तुज्यावर ते मला ठाव नाय. पन तुजा सबुद तू पालसील असी आसा हाय. तुला ह्यो चाल्ला व्हता तो प्रकार कलला नवता. पण आता सारं ठाव जालंया. तू सगल्य पोरींना पाटीव परत. मायबापाचं दुवं मिलतील तुला." अधिकारी काहीही न बोलता निघून गेला.
नीना आठ मुली घेऊन परतली. सगळा गाव तिच्याभोवती जमा झालं. ओलावल्या डोळ्यांनी तिनं ज्याच्या त्याच्या मुली ताब्यात दिल्या. मायलेकरांची गळाभेट डोळेभरुन पाहिली. सदाबरोबर ती घरात शिरली आणि हुंदक्यांनी तिचं शरीर गदगदलं.
"त्या मुलीमदं मी कायलला सोदत व्हते. ती दिसली नाय तसं मन लई उदास जालं. कसापायी करतीया मी ह्यी वनवन उपेग नसेल तर?"
सदाने तिच्या हळव्या मनावर फुंकर घातली.
"तुजं काम वाया नाई जानार. कायल गावलंच बग. पण आज किती जनाचं दुवं मिलालं तुला. त्या बी आपल्या लेकीच ना. पोरी कुटं हायेत येवडं कललं ना. पुडं लई सोप हाय आता."

नीनाला, तिच्या कामाला या सुटकेने अफाट प्रसिद्धी मिळाली. सैन्याविरुद्ध, दलालाविरुद्ध पावलं उचलण्याची सरकारने ग्वाही दिली. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी तिची जाहीर माफी मागितली. मुलींच्या सुटकेचं आश्वासन दिलं. गाव नीनाबरोबरच स्वत:वरही खूश झालं. मुलींच्या वाटेकडे डोळे लावून बसलं. परत आलेल्या मुलीचा आनंद त्यांच्याबरोबर जगाने साजरा केला. सैनिकांनी केलेले अत्याचार ऐकताना  मुलींबरोबर सगळी गळ्यात गळे घालून रडली. नीना प्रत्येक मुलीला वाडीवाडीतून फिरवून तिच्या यातना व्यक्त करायला सांगत होती. त्या निमित्ताने आणखी हात एकत्र येतील, मिळणार्‍या प्रसिद्धीमुळे सरकार जागं होईल या अपेक्षेत होती ती. पण वाटलं तेव्हढं सोपं नव्हतंच काही. मुली बोलायला तयार नव्हत्या, आई वडिलांना त्यांच्या हळव्या मनावर फुंकर कशी घालायची ते समजत नव्हतं.   आपल्या मुलीचं लग्न कसं होणार या विवंचनेत होते घरातले. त्यात भर म्हणून त्यातल्या एका मुलीला दिवस गेले. लक्षात आल्यावर वाडी बेचैन झाली. पळवून नेलेल्या मुली सगळ्याचं दु:ख होतं तरी अशा परिणामांची कोणाचीच मानसिक तयारी नव्हती. सैनिकांनी केलेले अत्याचार परवडले इतकं लाजिरवाणं वाटत त्या मुलीला. वाडीत कुजबूज सुरू झाली, वाढली आणि वाडीने संगनमताने त्या मुलीला जाळून मारलं. त्या दिवशी मध्यरात्री हा प्रकार कानावर घालायला दहा मैल धावत आलेल्या कातांचा चेहराच नीनाला दुसर्‍या लढाईची सुरुवात सांगून गेला.

नीना पेटून उठली. स्वत:वरच उसळली. हे असं काही होऊ शकतं याचा विचार का केला नाही म्हणून स्वत:लाच दोष देत राहिली. सरकारने आश्वासन पाळलं नव्हतंच. ना सैन्यावर कारवाई झाली, ना त्या दलालावर. भरीत भर म्हणून परत आलेल्या मुलींच्या सुरक्षिततेची काळजी हा मोठा प्रश्न तिचं काळीज पोखरून काढत होता. आपल्याच पोटच्या गोळ्यांना त्यांचा दोष नसताना आयुष्यातून उठवणं म्हणजे सैनिकांच्या अत्याचारापेक्षाही भीषण आहे. असं काही घडलं तर सार्‍या गावाने एकत्रित मार्ग काढायला हवा; पण जीव घेणं हे माणुसकीचं लक्षण नाही हे समजविण्यासाठी ती वाड्यावाड्यातून फिरत रक्ताचं पाणी करत राहिली. मुलींच्या सुटकेचे प्रयत्न चालूच होते. आता तिने थेट गोर्‍या लोकांच्या राष्ट्राध्यक्षांनाच पत्र पाठवलं. ते पत्र पोचण्याआधीच प्रसारमाध्यमांनी तिचं गार्‍हाणं त्या देशातल्या जनतेसमोर मांडायला सुरुवात केली. अस्वस्थ मनाने ती वाट पाहत राहिली. तिकडून हालचाल होण्याआधीच सीमेवरून तिला पुन्हा बोलावणं आलं. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. पुन्हा एकदा गाव तिच्या पाठीशी उभं राहिलं. या वेळेस परत आलेल्या मुलींना अमानुषपणे वागवणार असाल तर मला भेटीसाठी जायचंच नाही म्हणून ती सांगत राहिली. तिच्यावर अवलंबून असलेल्या, मुलींचा वाट पाहणार्‍या गावकर्‍यांच्या माना लाजेने झुकल्या. पुन्हा असं होणार नाही याचं आश्वासन मिळाल्यावरच  ती तयार झाली. या वेळेस इतर मुलींबरोबर कायलला घेतल्याशिवाय परत फिरायचं नाही हा तिचा ठाम निश्चय होता.

पुन्हा तीच गाडी गावाच्या वेशीबाहेर उभी राहिली. मात्र या वेळेस चालकाचा चेहरा झाकलेला नव्हता. त्याने तिलाही डोळे बांधायला लावले नाहीत. जेमतेम अर्ध्या तासात ते मागच्या ठिकाणी उभे होते.
पुन्हा तोच अधिकारी आणि तोच दलाल तिच्यासमोर उभे होते.
"बाई, तुम्ही पार आमच्या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोचलात. रान उठवलंत तुम्ही. हालचाल करण्याशिवाय पर्याय नाही ठेवलात."
"तुमी येवडं सुसिक्सित लोक सबुद पालायच इसरुन गेला नसताव तर ह्ये रामायन कसापाई जालं असतं? अजूनबी इचार करा. पोरी देवा आमाला परत. लई उपकार व्हतील. आनि सरिराची काज आसल येवडी तर तुमच्या पंतपदानाना सांगा आनि सागांवा पाटवा तुमच्या बायका पोरास्नी." सगळ्या वाड्यांच्या मनातलं ती त्या अधिकार्‍यांना म्हणाली.
"बाई, पंतप्रधानांना काय विनंती करावी हा आमचा प्रश्न आहे. पण तुम्ही म्हणता त्याच इराद्याने तुम्हाला बोलावलं इथे. परत करणारच आहोत तुमच्या लेकीबाळी आम्ही."
"या टायमाला सगल्या पोरीस्नी घेऊन जानार हाय मी."
"तसं करून चालणार नाही. आणि माझं बोलणंही पूर्ण करू दिलं नाहीत तुम्ही. आम्ही सांगत होतो की या वेळेस पोरी नाहीत फक्त एक पोर ताब्यात देणार आहोत आम्ही तुमच्या."
त्या अधिकार्‍याचं बोलणं संपतंय तोच बंदुकीचा दस्ता पाठीला टोचलेल्या अवस्थेत कायल समोर आली. नीनाचे डोळे तुडुंब भरले.
"काय दसा जाली गं माज्या बयेची." ती स्वत:शीच पुटपुटली. एकदम तिला थकल्यासारखं वाटलं. ज्यासाठी गेले वर्षभर वणवण केली, जिवाचं रान केलं ती पोटची पोर मिळाली होती. एक अध्याय आता संपणार याचा आनंद होताच पण अचानक रिक्त गळलेपण तिच्यासमोर आलं. त्याला बाजूला ढकलायचा प्रयत्न करत तिने डोळे पुसले. आता फक्त कायल दिसत होती. सारं विश्व स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं तिला. ती क्षणभर तशीच कायलकडे पाहत उभी राहिली. तेवढ्यात तिथल्याच एका सैनिकाने जोरदार हिसडा दिला आणि कायलचा तोल गेल्यासारखी ती धडपडली. नीना तिला सावरण्यासाठी पुढे धावली.
"थांबा."
करड्या स्वराने ती दचकली. खिळून उभी राहिली.
"तुमच्या मुलीला तुम्ही परत नेऊ शकता. अट एकच. यानंतर तुमचं तोंड बंद राहिलं पाहिजे. आमच्या विरुद्ध ब्र काढायचा नाही. आणि तसं झालं तर इथली कुठलीच मुलगी जिवंत हाती लागणार नाही तुमच्या."
नीना तशीच पुढे धावली. त्याने पुन्हा तिला थांबवलं.
"तुम्हाला आमच्या अटी मान्य आहेत असं समजायचं का आम्ही?"
"आर, जवल तरी गेवू दे पोरीला. नंतर सांगतू मी काय हाय माज्या मनात."
"नाही, तुम्ही मुलीला स्पर्श केलात तर आमच्या अटी मान्य आहेत असं समजून मुलीला न्यावं लागेल." सैन्यातला तो अधिकारी रुक्षपणे म्हणाला.

नीना पुतळ्यासारखी स्तब्ध झाली. क्षणभर मायलेकी डोळ्यात डोळा घालून एकमेकींकडे बघत राहिल्या. हाताच्या अंतरावर असूनही त्याच्यांत अंतर शिल्लक राहिलं नव्हतं. नजरेने दोघींनी एकमेकांना काय सांगितलं कोण जाणे. कायलने शांतपणे मान फिरवली आणि नीना पाठमोरी झाली. त्या सैन्यातल्या अधिकार्‍याकडे, दलालाकडे तुच्छतेचा कटाक्ष फेकत ती वेगाने बाहेर पडली.


परत आलेली नीना नेहमीची नीना नव्हती. बंडखोर, उस्ताही नीनाचा लवलेश तिच्या जागी नव्हता. वाड्यावाड्यातून रोजचे सात आठ तास  केवळ लोकांना या प्रश्नावर पेटून उठवण्यासाठी फिरणारी नीना हरवून गेली. स्वत:ला घरात डांबून ठेवल्यासारखी बाहेर फिरकेनाशी झाली. असं होऊन चालणार नव्हतं. लोकांना पूर्वीची नीना परत हवी होती. आपल्या मुली प्रत मिळवण्याचं बळ त्यांच्या एकेकट्याच्या अंगी नक्कीच नव्हतं. एव्हाना सीमेवरचं हे गाव आणि मुलींवर होणारे अनन्वित छळ पार बाहेरच्या देशांपर्यंत पोचले होते. जशा त्या मुली, ते गाव, तशी हे सारं रामायण पुढे आणणारी नीनाही लोकांच्या मनामनात रुजली होती. तिथं काय झालं या प्रश्नाला नीनाकडे उत्तर नव्हतं की तिला ते द्यायचं नव्हतं? कुणकुण लागली होती पण नक्की काहीच समजत नव्हतं. वर्तमानपत्र, दूरदर्शनच्या वार्ताहरांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. नीनाचं मौन संपत नव्हतं. सगळ्यांनी हार पत्करली. वेळ आली की मी बोलेन हा एकच धोशा तिने लावला होता. आणि आता सगळे त्या वेळेची वाट पाहत होते.
शेवटी तिने जाहीर केलं.
"आज मी लोकांनी आपली दुगं मोकली करावी, सगल्यांनी मदत कलावी म्हनून चालं जालंल्या आनि पंचवीस वरसं प्ररसिद आहे त्या पोग्रॅम मदे बोलनार हाय. त्यो बगा आनि सांगा मी येगलं काय कराया पायजे व्हतं ते."

नीना गोर्‍यांच्या देशातल्या प्रसिद्ध कार्यक्रमात सारं काही सांगणार होती. तिच्या गावासाठी या शोचं खास सॅटेलाईट प्रक्षेपण होणार होतं. किंबहुना तिचं बोलून झाल्यावर गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय हेही हा कार्यक्रम लगेच दाखविणार होता. गावकर्‍यांना जशी काय घडलं ते ऐकण्याची उत्सुकता होती तशी तिच्या माणसांच्या सगळं ऐकल्यावर काय प्रतिक्रिया होतील या शंकेने नीना अस्वस्थ होती.
वरवर पाहता ती शांतपणे बसली होती. जगातले लाखो लोक आज तिला पाहत होते. तिच्या कर्तृत्वाची गाथा माहितीपटाने संपली. कॅमेरा तिच्याकडे वळला. तिची अश्रूभरल्या नजरेने प्रेक्षकांचा जीव हेलावला. कॅमेर्‍याकडे स्थिर नजरेने पाहत ती बोलत राहिली.
"त्यांनी मला सांगितलं तू तूजी मुलगी गेवून जा आनी बस गप. कायलला आनलं बी माज्या म्होरं. किती आसुसलं माजं मन तिला जवल घेयाला. पन तेंची अट व्हती. लेकीला गेवून जायाचं तरच हात लाव म्हनाले. आनि सबुद नाई काडायचा त्येंच्याइरुद. लेक माजी लई खराब जाली व्हती. उबी व्हती डोल्यात पानी व्हतं. आमी येकमेकींना डोलाबरुन पायलं. कायलनं मान वलवली. आन मी उटलं तितून. पोरगी सिकली बगा माज्याकदून. मागं लागती तर काय कलनाल व्हतं मी? आनलं आसतं गुमान माज्याबरुबर, पन कोन सोदवनार मग माज्या तितं रावलेल्या लेकीबालींना? मी काय मोटी बाई नाई. मला मोटेपना बी नगं. मी बोलत नवती, वाटायचं मी केलं त्ये बरुबर केलं की नाय. नाय तर लोग मनायचं की आई हाये की वैरीन. म्हनून चुप बसली मी. मी आईच हाये पण तितं अदकून रायलेल्या सगल्यांची. माज्या सगल्या कायल मला परत आनायच्या हायत गरी."
"आणि अजूनही कायलची, इतर मुलींची सुटका झालेली नाही?" तिच्या निश्चयाला, टाळ्यांच्या मिळालेल्या कडकडाटाला भेदत निवेदिकेनं तिला बोलतं ठेवलं.
"नाय, पाच साल जालं या गोस्तीला. येक पल नाय जवा मी सोताला इचारते की कायलला परत आनलं नाय यात माज चुकी नाय ना जाली? पन ही लदाई लदायची हाये मला. सगले आले माज्यासंगत तर सगल्यांना गेवून नायतर येकलीने. जागं करायचं हाय मला या प्रसनावर सगल्यांना. मला पोरीचा लई अबिमान वाटतुया. ती म्हनली असती तर मी आनलं बी असतं तिला. सेवती आयेचं दिल हाय, पन कायलंनं रोकलं मला. आता तिला आनि सगल्या मुलींना आननारच परत. माजी बुमिका मी दावलीया आता. पक्की हाय मी माज्या निचयावर. फकस्त गाववाल्यांनी माग याया हवं. इस्वास टेवाया हवा तेंनी."
कॅमेरा गावातल्या लोकांवर वळला. आपल्या मुलीसाठी स्वत:च्या लेकीला परत आणायची संधी नाकारलेल्या बाईच्या मोठेपणाला दाद मिळत होती अश्रूने.
गोर्‍यांच्या देशांतील लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात शाळेचं तोंडही न पाहिलेल्या बाईच्या शहाणपणाला, धडपडीला मानवंदना दिली. भरल्या डोळ्यांनी नीना उभी राहिली. आता तिला नव्याने बळ आलं. मरगळ कुठल्या कुठे उडाली. परतल्यावर पुन्हा त्याच जोमानं मुलींच्या सुटकेचे प्रयत्न चालू ठेवायचे हा निश्चय तिने समोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांत डोकावत केला.

हुंदक्याच्या आवाजात एका कहाणीत पुन्हा रंग भरले जात होते. एका आईच्या अनेक लेकी सोडवून आणायला सारी दुनिया पुढे सरसावली. त्याच कार्यक्रमात वाडीवाडीतून फिरणार्‍या तिच्या थकल्या पावलांना विश्रांती मिळावी म्हणून गाडी देण्यात आली. ही फक्त सुरुवात होती......