निराशेच्या क्षणी तुमची लेखणी तुमच्या मदतीला येत नाही. दु:ख कमी झाल्यावरच शब्द आठवतात. कवितेची बीजं मात्र त्या क्षणीच रोवली जातात. माझ्या बहुतेक कविता रात्रीच्या अंधारातच जन्माला आल्या आहेत.
तुमच्यातली कला तुम्हाला जोपासावी लागते. एखाद्या जवळच्या मित्राची छोटीशी प्रतिक्रियाही मोठी जखम करु शकते आणि कवितेचा जन्म होवू शकतो
आनंदात मुक रहावं
पण वेदनेत बोलकं व्हावं!
मग, प्रत्येक क्षणाचं वारं
कसं अखंड झोकत जावं!
निराशेच्या झटक्यात मी माझ्या कविता फाडून टाकल्या. काही काळानंतर माणसाला आपलीच रचना केवढी परकी वाटायला लागते. आणि तरीही प्रत्येकाला त्या त्या वेळी आपण म्हणजेच मोठे प्रतिभावंत वाटत असतो.
तुमच्यातली कला तुम्हाला जोपासावी लागते. एखाद्या जवळच्या मित्राची छोटीशी प्रतिक्रियाही मोठी जखम करु शकते आणि कवितेचा जन्म होवू शकतो
आनंदात मुक रहावं
पण वेदनेत बोलकं व्हावं!
मग, प्रत्येक क्षणाचं वारं
कसं अखंड झोकत जावं!