ताडोबाच्या राणीच्या नाट्यमय जीवनकहाणीत मानवी भावभावना आणि सिनेमातलं रस-रंग-नाट्य जिवंत होतं. माया वाघिणीच्या निमित्तानं वाघांचं जीवन, वनखातं, वन्यजीव संरक्षणात गुंतलेली माणसं, अभयारण्यातील ग्रामजीवन आणि पर्यटन उलगडतं.
या पुस्तकातील काही प्रकरणांचं अभिवाचन आणि लेखक श्री अनंत सोनवणे यांच्याशी संवाद.
अभिवाचन - प्रसाद घाणेकर, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर, निलेश कोदे.