मोसम,
माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का? त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात विलक्षण चढ उतारांना जिद्द, चिकाटीने सामोरे गेलेले श्री ठाणेदार हे नाव सुपरिचित आहे ते त्यांची ही कहाणी सांगणार्या पुस्तकांनी. व्यवसाय, लेखन आणि आता राजकारण अशा वेगवेगळ्या प्रांतात आपल्या नावाची मोहोर उठवणार्या या व्यक्तिमत्त्वाला भेटू या २७ तारखेला ११ वाजता (EST) मराठी भाषा दिनानिमित्त!