Saturday, March 17, 2012

आस

कुणीतरी म्हणालं,
सांभाळ आता तुझ्या बाबाना
बाई गेल्यावर खचतो माणूस
माझं उदास हसु,
मनातला डोंब फूटून
तांडव घालायला लागलेले आसू
दडवले शब्दांच्या मखरात,
म्हटलं,
असं कसं होईल
त्याच्या मायेची पाखर
आणखी काही वर्ष तरी राहिल

ती गेली तेव्हाच मी का नाही गेलो
दचकून पाहिलं बाबाकडे
वाटलं,
घट्ट मारावी मिठी
आई गेली आत्ताच, तू नको जाऊ
शब्दाच्या आजूबाजूला
घुमायला लागलं पारव्यासारखं,
कुणाचंतरी  म्हणणं
बाई गेल्यावर खचतो माणूस....

खरचं का रे तसं झालं...
खचलास का रे बाबा तू?
केलास ना पुरा तुझाच ध्यास
ती गेली त्याच वाटेवर टाकलंस पाऊल
लेकींसाठी नाहीच ना अडला पाय

कधीतरी का होईना,
कुणाचंतरी म्हणणं खोटं का नाही ठरलं
आई गेल्यावर, बाबा तुला आमच्यासाठी रहायला
का नाही जमलं?


12 comments:

  1. हृद्य कविता. बाबाबद्दलच्या जिव्हाळ्याने मन भरुन आलं.

    ReplyDelete
  2. हृदयस्पर्शी कविता. वाचताना डोळे ओलावले.

    ReplyDelete
  3. धन्यवाद इंद्रधनु, मीनल आणि अपूर्वा.

    ReplyDelete
  4. can see so much of me and my dad in this poem when mom went away. oh...you have expressed it so finely.

    ReplyDelete
  5. नि:शब्द !! भावनातीत

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद फीलींग्ज!

      Delete
  6. Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हर्षदा

      Delete
  7. manala bhavun geli kavita
    karun bhav asala tari kavita matr khupach chan!!!!

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.